Radhakrishna Vikhe Vs Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Vs Sharad Pawar : '..आणि आपण त्यांचे फोटो लावत बसायचे का?' ; मंत्री विखेंची शरद पवारांच्या राजकारणावर टीका!

Pradeep Pendhare

Ahmednagar Political News : भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अहमदनगर जिल्ह्याच्या जीवावर शरद पवार यांनी राज्यात राजकारण केले आणि आपण त्यांचे फोटो लावत बसायचे का? असा सवाल करत विखेंनी पवारांच्या राजकारणावर साधला निशाणा.

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पाठपुराव्यातून राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने मंजूर केलेल्या 'वांबोरी चारी टप्पा 2'चे भूमिपूजन पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्या हस्ते झाले. मंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांच्या भाषणात शरद पवार यांच्या राजकारणावर तुफान टोलेबाजी केली.

राधाकृष्ण विखे म्हणाले, "पुणे जिल्ह्याने नेहमीच नगर जिल्ह्यावर अन्याय केला. शरद पवार (Sharad Pawar) यांचे जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान काय? त्यांनी नेहमीच आपल्या जिल्ह्याच्या जीवावर राज्यात राजकारण केले आणि आपण त्यांचे फोटो लावणार का?" शरद पवार यांच्यावर आरोप झाले होते. तेव्हा 1991 सालीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी हेलिकॉप्टरने नगर जिल्ह्यामध्ये आले होते, तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांना हेलिकॉप्टरच्या खाली उतरून दिले नव्हते, याची आठवण राधाकृष्ण विखेंनी करून दिली.

'मविआ'चे सरकार आल्यास सर्व योजना बंद होतील -

'खासदार शरद पवार मतासाठीचे राजकारण करत असून छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या नावाला त्यांनी विरोध केला. लाडक्या बहिणी आता तुमचे सावत्र भाऊ मत मागायला येणार असून तुम्ही त्यांना निवडून दिले, तर युती सरकारच्या सर्व योजना ते बंद करणार आहेत. युती सरकार भेदभाव करत नसून सर्वांना समान न्याय देण्याचे काम करत आहे, राहुरी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व शिवाजीराव कर्डिले हेच करतील', असे संकेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले.

20 गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार -

शिवाजीराव कर्डिले यांनी नगर-पाथर्डी तालुका जिरायत भाग म्हणून ओळखला जातो (कै.) बाळासाहेब विखे पाटील आणि गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नातून वांबोरी चारी टप्पा 1चे काम पूर्ण झाले. आता वांबोरी चारी टप्पा 2 टप्प्याचे कामासाठी 92 कोटी रुपये मंजूर करून आणले. या माध्यमातून 20 गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. कार्यकर्त्यांनी गट-तट विसरून काम करावे, दोन्ही गटाचा सन्मान केला जाईल, असे सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT