Radhakrishna Vikhe Patil  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil : विखेंच्या साखर पेरणीत मिठाचा खडा?, विवेक कोल्हेंची दुष्काळाच्या मुद्द्यावरून टीका!

Pradeep Pendhare

Ahmednagar Politics News : भाजपचे ज्येष्ठ नेते महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडून दिवाळीच्या तोंडावर साखर वाटपचे गोड कार्यक्रम सुरू असतानाच भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी टीका करत मिठाचा खडा घातला आहे.

नगर जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीकडे लक्ष वेधले आहे. विवेक कोल्हे यांनी विखे यांना राज्यात तिसऱ्या क्रमांकावर मंत्रिपदाची शपथ घेतल्याची आठवण करून देत नगर जिल्ह्यातील दुष्काळाकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षाची परवा आम्ही करत बसणार नाही -

नगर जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीवर आणि जायकवाडीला पाणी सोडण्याच्या आदेशावर भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी पालकमंत्री विखेंच्या चुप्पीवर टीका केली. 'नगर जिल्ह्यात तीव्र दुष्काळ आहे. राज्य सरकारने राज्यात 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. यात नगर जिल्ह्यातील एकही तालुक्याचे दुष्काळग्रस्त यादीत नाव नाही.

नगर जिल्ह्यातील नागरिकांवरच हा अन्याय का? राज्यात सत्ता स्थापनेवेळी आपण तिसऱ्या क्रमांकावर शपथ घेतली. पालकमंत्रिपद तुमच्याकडे आहे. तरीदेखील दुष्काळी परिस्थितीबाबत आपण मौन बाळगून आहात, ही मोठी शोकांतिका आहे. आम्ही जनतेमुळे सत्तेत आहोत. त्या जनतेला न्याय देण्यासाठी पक्षाची परवा आम्ही करत बसणार नाही', असेही विवेक कोल्हे म्हणाले.

नगर दक्षिणेकडून राजकीय लोकप्रतिनिधी नगरमधील दुष्काळाकडे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयाकडे धाव घेत आहे. राज्य नेत्यांचे लक्ष वेधत आहे. परंतु नगर जिल्ह्यात पावसाची कमी झाला असताना आणि दुष्काळीच्या झळा सुरू झाल्या असताना एकही तालुका दुष्काळग्रस्त जाहीर न होणे हे कोडेच आहे, असेही विवेक कोल्हे म्हणाले.

जायकवाडीला सोडण्यात आलेल्या पाण्याला रोखण्यासाठी नगर आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र आले पाहिजे. यासाठी न्यायालयीन लढाई सुरू आहे. पुढे रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचीदेखील तयारी असल्याचे विवेक कोल्हे म्हणाले.

जनतेची दिवाळी गोड झाली -

''श्री गणेश सहकार साखर कारखाना विखेंकडे होता. त्यावेळी सभासदांना साखर मिळत नव्हती. कारखाना आमच्याकडे आल्यानंतर आम्ही नऊ हजार सभासदांना प्रत्येकी दहा किलो साखर देण्याची घोषणा केली. यानंतर सर्वच राहाता तालुक्यातील जनतेची दिवाळी गोड झाली.

विखेंनी मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबास पाच किलो साखर आमच्यामुळेच वाटली. लोकशाहीसाठी सक्षम विरोधकांची गरज असते. आम्ही विरोधकांना आवाज देण्याचे काम केले. राहाता तालुक्यात जनतेला अरे, तुरे करणारे आता भाऊ, दादा करायला लागलेत, यातच आमचे समाधान आहे,'' असे विवेक कोल्हे यांनी म्हटले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT