Survey work for Central Railway’s proposed Trimbakeshwar parallel rail route creates tension among local farmers. sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Trimbakeshwar Railway Project : नवे संकट! एनएमआरडीए पाठोपाठ रेल्वेसाठी सर्वेक्षण, त्र्यंबकेश्वरचे शेतकरी हवालदिल

Rail Project Nashik Farmers : मध्य रेल्वे कडून त्रंबकेश्वर रस्त्याला समांतर रेल्वेचा प्रस्ताव असून सर्वेक्षण सुरू झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची घरे आणि जमीन जाणार असल्याने ते चिंतेत आहेत.

Sampat Devgire

Nashik News: कुंभमेळ्याच्या नावाखाली 'एनएमआरडीए' ने त्र्यंबक रोड लगत १०० मीटर क्षेत्रात पाडकाम केले. त्यामुळे शेतकरी संकटात आले. या विरोधात संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी शुक्रवारी शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी त्र्यंबकेश्वर रस्त्याची प्रत्यक्ष स्थिती पाहणी करण्याचे ठरले. त्यानंतर शेतकऱ्यांची घरे व इमारती पाडण्याचा अहवाल मागविला जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना याबाबत पाहणी करण्यासाठी सूचना केल्या. ही स्थगिती मिळाल्याने किंचित दिलासा होता. मात्र आता याच मार्गाला समांतर रेल्वेचे सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांची स्थिती आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे.

या संदर्भात मध्य रेल्वेने नियुक्त केलेल्या संस्थेचे काही कर्मचारी घटनास्थळी पाहणीसाठी येऊन गेले. नाशिक डहाणू बीजी रेल्वे मार्गासाठी ड्रोन मार्गे सर्वेक्षण करण्यात येईल. त्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजर अनिकेत देवरे यांनी पोलिसांकडे परवानगी मागितली आहे.

कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वरच्या रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला त्यासाठी सध्याच्या रस्त्याची जागा पुरेशी आहे. मात्र 'एनएमआरडीए'ने रस्त्याच्या मध्य रेषेपासून दोन्ही बाजूला 50 मीटर जागा ताब्यात घेण्याचे ठरविले आहे. त्यासाठी अनेक शेतकऱ्यांची घरे आणि इमारती पाडण्यात आल्या.

या संदर्भात आमदार हिरामण खोसकर आणि सरोज अहिरे यांसह स्थानिक शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ शुक्रवारी मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यानंतर किंचित दिलासा मिळाला होता. आता रेल्वेसाठी सुमारे १०० मीटर रुंदीची जागा प्रस्तावित आहे. डहाणू ते नाशिक मार्गे रानवड (निफाड) असा हा रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे.

रेल्वेच्या सर्वेक्षणासाठी अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यामुळे या भागातील शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. हा रेल्वे मार्ग झाल्यास परिसरातील पंधरा गावातील बहुतांशी जमिनी प्रकल्पसाठी जातील. येथील शेतकरी भूमिहीन होण्याचा मोठा धोका आहे.

या पार्श्वभूमीवर आता शेतकरी संघटित होऊन यावर पुढील दिशा ठरविणार असल्याची माहिती गोकुळ महाले यांनी दिली. रेल्वेचे सर्वेक्षण सुरू झाल्यास पुढे काय करायचे हा प्रश्न आहे. नव्या पिढीला रोजगार नाही, शेतकरी आधीच संकटात आहेत, आता त्यावर भूमिहीन होण्याची स्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT