Sharad Pawar & Chhagan Bhujbal
Sharad Pawar & Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

डॉ. आंबेडकरांनी फक्त घटनाच नाही तर देशाला दिशा देण्याचे काम केले.

Sampat Devgire

नाशिक : देशातील बहुसंख्य घटक कष्टकरी, शेतकरी यांच्या जीवनात बदल करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले.

खेडगाव (दिंडोरी) येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयच्या नूतन इमारतीचा उदघाटन व ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, पालकमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.

यावेळी खासदार शरदचंद्र पवार म्हणाले की, देशाला फक्त घटनाच नाही तर देशाला दिशा देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. महात्मा फुले, शाहू महाराज यांनी या अगोदरच शेतकरी, शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. यामुळे आपण त्यांचे नाव घेत आहोत. शाहू-फुले-आंबडेकर यांनी विज्ञानावर आधारित समाजकारण केले.नाशिक मध्ये आल्यावर मला आनंद होतो की इथे शेतीत नवनवीन प्रयोग केले जात आहे. इथले तरूण शेतीत नवीन प्रयोग करत असतात याचा आनंद आहे. अडचणी खूप आहेत सत्ता येते सत्ता जाते मात्र आपण बांधिलकी ठेवली पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, श्रीराम शेटे आणि नरहरी झिरवाळ यांचा सत्कार आणि नवीन वस्तूच्या निमित्ताने आपण एकत्र आलो आहोत.सत्ता, मिळालेला अधिकार याचा कधीही परिणाम न होऊ देणारे असे श्रीराम शेटे आहेत. मधल्या काळात साखर कारखान्याबाबत नाशिकच चित्र फारस चांगलं नव्हतं. मात्र श्रीराम शेटे यांनी या भागात पुढाकार घेऊन कामाची सुरुवात केली आणि आज नाशिकची परिस्थिती बदलते आहे. विविध प्रयोग यानिमित्ताने श्रीराम शेटे करत असतात विजेची निर्मिती सुद्धा आपण करू शकतो. हे आपण सिद्ध केले आहे. राज्यातील १६० सहकारी कारखान्यांचा एक संघ आहे आणि त्या संघात दोन महत्वाचे लोक असतात त्यात एक अध्यक्ष आणि दुसरे उपाध्यक्ष हे उपाध्यक्ष पद सर्व साखर करखाण्याच्या लोकांनी श्रीराम शेटे यांच्यावर दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, नरहरी झिरवाळ यांचा देखील येथे सत्कार आज केला जात आहे. त्यांना उपाध्यक्ष पद द्यायचा विचार आला तेंव्हा अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. मात्र आम्ही त्यांनाच उपाध्यक्ष केले आज अनेक लोक असा उपाध्यक्ष पहिला नाही अशी प्रतिक्रिया देत आहेत असे सांगत यावेळेच साहित्य संमेलन विज्ञाला वाहून देणार होत त्यामुळे ह्या साहित्य संमेलनाला विशेष महत्व आले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार श्रीनिवास पाटील, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस निलिमाताई पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सुधीर तांबे, आमदार नितीन पवार, आमदार दिलीप बनकर, आमदार सरोज आहिरे, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार संजय चव्हाण, मारोतीराव पवार, शिरिषकुमार कोतवाल, नानासाहेब बोरस्ते,माणिकराव बोरस्ते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, एमव्हीपीचे संचालक नानासाहेब महाले, भगीरथ शिंदे उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT