Devendra Fadnavis  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devendra Fadnavis Politics: अतिवृष्टीमुळे कर्जमाफीचे राजकारण पुन्हा तापले; जिल्हा बँकांपुढे नवे संकट तर मुख्यमंत्र्यावर विरोधकांचा दबाव!

Heavy rains hit farmers, loan waiver politics, Uddhav Thackrey, NCP & Bachhu Kadu Deemands, District Banks' recoveryin Trouble -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह बच्चू कडू यांचा कर्जमाफीसाठी राज्य सरकारवर दबाव

Sampat Devgire

District Bank News: उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागात अतिवृष्टीचे थैमान आहे. यानिमित्ताने विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा कर्जमाफीचे राजकारण सुरू केले आहे. मोठा फटका जिल्हा बँकांना बसण्याची भीती आहे.

महायुती सरकारने निवडणुकीआधी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यामुळे विरोधकांनी या प्रश्नावर राज्य सरकारला घेरले आहे.

राज्यात गेल्या आठवड्यात जोरदार अतिवृष्टी झाली. त्यामुळे राज्यभर शेतीवर संकट कोसळले. या शेतकऱ्यांना मदतीच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, बच्चू कडू यांसह रोधी पक्षांनी कर्जमाफीचा मुद्दा पुढे केला आहे.

शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत पंचनामे करून भरपाई मिळावी, याबाबत राज्य शासन प्रयत्नशील आहे. विरोधी पक्षांनी मात्र आता तातडीने कर्जमाफी करावी यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांपुढे कर्ज भरावे की नाही अशी द्विधा स्थिती आहे.

राज्याची आर्थिक स्थिती अडचणीची असताना यापूर्वीच्या नुकसानीची भरपाई देण्याची प्रक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली. ३० सप्टेंबर ही भरपाई देण्याची अंतिम तारीख होती. या कालावधीतच अतिवृष्टीने नवे संकट उभे केले.

अनेक जिल्हा बँका सध्या खरिपाचे कर्जवाटप करीत आहेत. बँकांची वसुली देखील सुरू आहे. सहकारी संस्था आणि जिल्हा बँकांना कर्ज वसुलीवर अतिवृष्टीचा परिणाम झाला आहे. त्याचा मोठा फटका सहकार क्षेत्रालाही बसण्याची शक्यता आहे.

सध्या नाशिक, बीड, धाराशिव आणि नागपूर जिल्हा बँका आर्थिक अडचणीत आहेत. नागपूर जिल्हा बँकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन मदत केली. उर्वरित तीन बँकांपुढे मात्र अडचणी कायम आहेत. बँकांच्या कर्जबसुलीवर अतिवृष्टीने पाणी फिरवले आहे.

या स्थितीत नाशिक जिल्हा बँक मात्र काहीशी अपवाद ठरली आहे. प्रशासक संतोष बिडवई यांनी सक्ती न करता शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यावर भर देण्याचा सूचना दिल्या आहेत. त्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद आहे. गेल्या आठवड्याभरात १५ कोटींची वसुली झाली. विशेष म्हणजे अतिवृष्टी असतानाही मंगळवारी एकच दिवसात ६.७२ कोटींची वसुली झाली हे विशेष.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT