Gulabrao Patil & Unmesh Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Unemsh Patil Politics: उन्मेष पाटील यांचे गुलाबराव पाटील यांना आव्हान;...तर माझ्यासोबत गुन्हा दाखल करायला यावे लागेल!

Farmers Crop insurance issue, Unmesh Patil Replied to Gulabrao Patil, Shivsena UBT & Eknath Shinde party politics heated up- पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विधानाचा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते उन्मेष पाटील यांनी घेतला कडक शब्दांत समाचार

Sampat Devgire

Unmesh Patil News: जळगावच्या केळी उत्पादकांना मुदत संपल्यावर देखील पिक विम्याची भरपाई मिळालेली नाही. त्याविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने जळगाव शहरात शेतकरी आक्रोष मोर्चा काढला. या मोर्चाबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी खासदार उन्मेष पाटील यांना डिवचले होते.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या आक्रोश मोर्चाने जळगावचे राजकारण चांगलेच तापले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या मोर्चातील नेत्यांना हिणवले होते. पिक विम्याची रक्कम केळी उत्पादकांच्या खात्यात जमा होणार असल्यानेच हा मोर्चा काढल्याचे विधान त्यांनी केले होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रारंभी ‘माझ्या गावात मोर्चा काढून दाखवावा, बघा काय उत्तर देतो’ असे आव्हान माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना दिले होते. ते आव्हान बच्चू कडू यांनी स्विकारले. येत्या ५ ऑक्टोबरला श्री कडू जळगावला जाणार आहेत.

पालकमंत्री पाटील यांनी राज्य शासन २८ सप्टेबरला शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा करणार आहे. याची माहिती मिळाल्यानेच आक्रोश मोर्चा काढला असा आरोप केला होता. त्याला माजी खासदार पाटील यांनी देखील उत्तर दिले आहे.

माजी खासदार पाटील म्हणाले, पिक विमा नियमानुसार ३० जुलैला विम्याचे नुकसान तसेच अन्य स्थिती याबाबत माहिती जाहीर करणे अपेक्षित होते. नुकसानीचा आढावा घेतल्यावर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १५ सप्टेबरला भरपाईची रक्कम जमा व्हायला हवी होती. याबाबत कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांची समिती आहे.

विमा भरपाई देण्याचा कालावधी केव्हाच उलटून गेला आहे. मात्र आम्हाला शेतकऱ्यांचे भले झालेले पाहिजे आहे. राजकारण करायचे नाही. अन्यथा पालकमंत्री पाटील यांच्यावर टिका केली असती. राज्य सरकारला जाब विचारला असता.

आता पालकमंत्री म्हणतात, तर २८ सप्टेबरला शेतकऱ्यांच्या खात्यात केळी भरपाईची रक्कम जमा करा. आम्ही त्यांचे अभिनंदन करायला जाऊ. जमा झाली नाही तर मात्र कायद्यानुसार पालकमंत्री पाटील यांनी आमच्या बरोबर पोलिसांत गुन्हा दाखल करायला यावे.

मुख्यमंत्री देवेंद्र फ़णवीस यांनी नुकतीच शेतकऱ्यांना तीन हजार तीनशे कोटींची भऱपाई देण्याचे घोषीत केले आहे. पालकमंत्री पाटील यांनी जळगावच्या केळी उत्पादकांबाबत भरपाईची घोषणा देखील केली आहे. त्यामुळे आता या विषयावर सत्ताधारी अन् विरोधक दोघांनीही बाह्या सरसावल्या आहेत.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT