Chhagan Bhujbal & Dilip Bankar
Chhagan Bhujbal & Dilip Bankar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

अलिकडचं पद्मश्री वाटप, त्यातून निघणारी मुक्ताफळं यावर काय बोलावे?

Sampat Devgire

रानवड : अलिकडे जे पद्मश्री पुरस्कारांच वाटप सुरु आहे,ते जरा गंभीरच झाले आहे. या पद्मश्रीचं काय करायचे? हे जरा कठीणच आहे. अलिकडचे जे काही पद्मश्री वाटप सुरु आहे, त्याच्यातून जी मुक्ताफळे बाहेर पडत आहेत. त्याचं काय सागांव बरं. म्हणजे पार भगतसिंगांपासून तर लोकमान्य टिळक, सावरकर असतील राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडीत नेहरू यातील कोणी काय केलच नाही, असे चित्र उभे केले जात आहे, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

रानवड सहकारी साखर कारखान्यांच्या ३९ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी कृषीमंत्री दादा भुसे, विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ, संयोजक आमदार दिलीप बनकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, मविप्र संस्थेच्या सरचिटणीस निलीमीताई पवार, आमदार सर्वश्री माणिकराव कोकाटे, नितीन पवार, सरोजताई अहिरे, किशोर दराडे प्रमुख पाहुणे होते.

श्री. भुजबळ म्हणाले, पद्मश्री काकासाहेब वाघ काम करणारे होते. पद्मश्री मिळाली तेव्हढेच कायमचे कर्मवीर ही पदजवी जनतेने दिली, हे फार महत्त्वाचे आहे. ही धडाडी जी आहे, ती काकासाहेब वाघ यांच्यात होती. अहो हा कारखाना मिळवण सोपी गोष्ट होती का?. हा नियम, तो नियम, हे नाही, ते नाही अनेक अडथळे येतात. कठीण आहे. हिंदीत म्हटले जाते, मुश्कीलो के दौर मे, हर कोई बहाने की चादर ओढ लेता है. पर हारी हुई बाजी को पलट देता है वही असली शेर होता है. वो दिलीपकाका बनकर होता है. हारी हुई बाजी को पलट दिया उन्होने, असे सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

श्री. भुजबळ पुढे म्हणाले, आज पवार साहेबांच्या हस्ते त्याचे गाळप सुरु होत आहे. कारण ऊस आणि साखर याचंगणित सोप नाही. ती सहज सुटत नाहीत. दिल्लीमध्ये जर चांगली माणसं बसली असती, पवार साहेबांसारखी तर हे प्रश्न सुटले असते. परंतु आता काय सांगायचे. मात्र अशा अडचणीतून कारखाने चालवायचे म्हणजे अतिशय कठीण आहे. श्रीराम शेटे यांच्यासारख्यांनी कारखाने चालवून दाखवला. अनेक अडचणी आहेत. मात्र आता या मातीतील दिलीप बनकर पुढे येत आहे. त्याला अजित पवार, पवार साहेब हे सगळे मदत करायला तयार आहे. अडचणी तर फार आहेत. मात्र त्यातून मार्ग काढावा लागेल. पायात पाय घालू नका. अडचणी आणू नाक. राजकारण करू नका. कोरोनाने अडचणी निर्माण केल्या. मात्र त्यातून मार्ग काढेल. बाजार समितीच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. बाजार समिती देखील त्यांच्या नेतृत्वाखाली चालवू द्या.

ते म्हणाले, काकासाहेब वाघ यांना पद्मश्री तर मिळालीच, मात्र जनतेने कर्मवीर ही पदवी दिली. पंडीत जवाहरलाल यांचा देखील आज जन्मदिवस. पंडीत जवाहरलाल नेहरू असे म्हटले होते की, हे जे कारखाने, धरणं आहेत हे आपल्या देशाचे दागीने आहेत. रत्न आहेत. त्यातूनच देशात संपत्ती निर्माण झाली. मोठ मोठे कारखाने, धरणं उभी राहिली. आज जी काही देशाची प्रगती पाहतो ती निर्माण झाली आहे. त्यातील नवरत्न आहेत. अर्थात आता त्यातील एक एक रत्न विकायचे काम सुरु आहे. नव्याने आलेले दिल्लीतील सरकार ते करते आहे, ही वेगळी बाब आहे. मात्र पंडीत नेहरूंनी जी दुरृष्टी दाखवली की, कारखाने निर्माण झाले पाहिजे. शेतकरी, शेतीचा उपयोग त्यामध्ये झाला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी धरणं बांधली आणि हीच खरी रत्न आहेत असे पंडीत नेहरू म्हणत.

नेमका याच दिवशी कर्मवीर काकासाहेब वाघ यांनी जो कारखाना सुरु केला, तो बंद पडला. तो आज दिलीप बनकर यांच्या प्रयत्नाने सुरु आहे. कर्मवीर काकासाहेबांना कर्मवीर ही पदवी जनतेने दिली. पद्मश्री तर दिलीच. या पद्मश्रीचं काय करायचे हे जरा कठीणच आहे. अलिकडचे जे काही पद्मश्री वाटप सुरु आहे, त्याच्यातून जी मुक्ताफळे बाहेर पडत आहेत. त्याचं काय सागांव बरं. म्हणजे पार भगतसिंगांपासून तर लोकमान्य टिळक, सावरकर असतील राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडीत नेहरू यातील कोणी काय केलच नाही. स्वातंत्र्य तर मिळालच नाही. फक्त आत्ता २०१४ ला स्वातंत्र्य मिळाले असे ते म्हणतात. असे जे पद्मश्री व्हायला लागले, त्याबाबत काय बोलावे? असा प्रश्न त्यांनी केला.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT