Chhagan Bhujbal & Prithviraj Chavan
Chhagan Bhujbal & Prithviraj Chavan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal On Prithviraj Chavan : १५ वर्षांचे सरकार पृथ्वीराज चव्हाण आल्यावरच कसे पडले?.

Sampat Devgire

Chhagan Bhujbal News : महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार १५ वर्षे सुरळीत कामकाज करीत होते. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतरच ते सरकार का पडले?. याचा विचार त्यांनी करावा. मला वाटते, चव्हाण यांनी थोडे अंतर्मनात डोकावून पहावे, असे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले. (Chhagan Bhujbal criticize Prithviraj Chavan on his statement Regarding NCP)

काँग्रेस (Congress) नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि राष्ट्रवादी काँग्रेसविषयी (NCP) केलेल्या वक्तव्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी त्यांना आत्मपरिक्षणाचा सल्ला दिला आहे.

श्री. भुजबळ आज येथे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, थोडे फार वाद, विवाद सर्वच पक्षांत असतात. ते राजकारणात होतच असते. काँग्रेस पक्षात देखील ते आहेत. भाजप, शिवसेना सगळीकडे असतात, कुठे नसतात. मात्र वेगवेगळ्या विचारसरणीचे तीन, तीन पक्ष एकत्र आल्यावर घर्षण होणार. मात्र नेत्यांनी जर त्यात अशी काही विधाने केली तर जास्त विस्कळीतपणा निर्माण होतो. तो होता कामा नये. पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत.

ते पुढे म्हणाले, पंधरा वर्षे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेत होते. ते सरकार त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये गेले. त्यामुळे या सगळ्यांनी आपल्या अंतर्मनामध्ये शोध घेतला पाहिजे की, असे कसे झाले?. पंधरा वर्षे असताना जे शक्य झाले नाही, ते आपण मुख्यमंत्री असतानाच का झाले?. आता पुन्हा जर एक चांगली बांधनी होत असेल तर त्यात पुन्हा वेगळे काही होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे जोपर्यंत एकत्र आहेत, तो पर्यंत कोणी काहीही बोलले तरी काहीही फरक पडणार नाही.

राष्ट्रवादीत अर्धा डझन सक्षम नेते

शरद पवार यांनी नुकत्याच केलेल्या घोषणेनंतर देशाच्या राजकारणात त्याचे तरंच उमटले. उत्तराधिकारी याबाबत झालेली विधाने याविषयी श्री. भुजबळ म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्याध्यक्ष पद निर्माण करणार आहेत की नाही?. कार्याध्यक्ष पद निर्माण करणार असतील, तर त्याची काय पद्धत असेल हा पहिला मुद्दा आहे. त्यानंतर जर तसे झालेच तर किमान अर्धा डझन तरी नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत की ते ती जबाबदारी स्विकारू शकतात. जयंत पाटील देखील त्यातील एक आहेत. मात्र आज आमच्यासमोर हा मुद्दा नाही, हे देखील श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT