Radhakrishna Vikhe On Manoj Jarange
Radhakrishna Vikhe On Manoj Jarange Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe On Manoj Jarange : 'मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही'; भाजप नेते विखेंनी जरांगेंना फटकारलं

Pradeep Pendhare

Radhakrishna Vikhe : मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर तापला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा फटका भाजपला लोकसभेला बसल्याचे काही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. या मुद्यावर आता भाजप आक्रमक होताना दिसत आहे.

भाजप नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मराठा आंदोलक यांनी आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारचे संपूर्ण ताकदपणाला लावली आहे. पण मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही. आरक्षणाचे आंदोलन भरकटत चालले आहे. जरांगेच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे, असं नाही. बाकी या समाजासाठी काम करणारी लोक भरपूर आहेत, अशा शब्दात फटकारले आहे.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) नांदेड दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी ही मराठा आणि ओबीसी आंदोलनावर सरकारची भूमिका मांडली. ही मांडताना त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या भूमिकेला फटकारले. मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही. बाकी या समाजासाठी काम करणारी लोक भरपूर आहेत. आम्ही तर प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करणारे कार्यकर्ते आहेत. आम्ही आरक्षणासंदर्भात नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. सरकार आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी प्रत्येक पातळीवर काम करत आहेत. मराठा आणि ओबीसी समाज या दोघांच्या आरक्षणावर सरकार तोडगा काढणार असल्याचे राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. दरम्यान,

राधाकृष्ण विखे म्हणाले, "मराठा समाज आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकार गंभीर आहे. दोन्ही समाजाच्या आरक्षणाचा सरकार विचार करत आहे. यावर लवकरच तोडगा काढला जाईल. आरक्षणाचे आंदोलन आता भरकटत चालले आहे. जरांगेच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिले पाहिजे असं नाही". आम्ही सुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत. मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही. बाकी या समाजासाठी काम करणारी लोक भरपूर आहेत. आम्ही तर प्रत्यक्ष ग्राऊंडवर काम करणारे कार्यकर्ते आहोत, असे राधाकृष्ण विखे यांनी म्हटले. दरम्यान, मनोज जरांगे यांनी मुस्लिम समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे.

सुजय याच्या निर्णयामागे कार्यकर्त्यांचा आग्रह

भाजप उमेदवार सुजय विखे यांचा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून झालेला पराभव हा कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे सुजय याने ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅड पडताळणीचा निर्णय घेतला. आम्ही काम केले आहे. निकाल आपल्याच बाजूने आला पाहिजे होता. काहीतरी गोंधळ आहे, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. यातूनच कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याने सुजय याने निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्याचे राधाकृष्ण विखे यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT