Rahul Gandhi | Veer Savarkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rahul Gandhi Politics: सावरकरांवरील वक्तव्य; राहुल गांधींच्या खटल्यात वकिलांनी शोधली नामी शक्कल, खटला होऊ शकतो बाद?

Rahul Gandhi’s Legal Strategy in Savarkar Defamation Case: स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील वक्तव्यांबाबत राहुल गांधी यांच्या विरोधातील खटले होऊ शकतात रद्द, `हे` आहे कारण!

Sampat Devgire

Rahul Gandhi Court Case: लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेले विधान राजकीय वादाचा विषय बनले आहे. यासंदर्भात सावरकरांच्या समर्थकांनी देशभरात अनेक ठिकाणी खटले दाखल केले आहेत. नाशिकमध्ये सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी येत्या २६ ऑगस्टला होणार आहे.

भारत जोडो यात्रे दरम्यान हिंगोली येथे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सावरकरांविषयी वक्तव्य केले होते. असे वक्तव्य त्यांनी देशभरात विविध कार्यक्रमांमध्ये देखील केले होते. त्यावरून भाजपचे समर्थक तसेच राहुल गांधी यांच्या विरोधकांनी त्यांना राजकीय दृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी मोहीम उघडल्याचा आरोप होतो.

नाशिक येथे देवेंद्र भुतडा यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. या खटल्याच्या सुनावणीत यापूर्वी राहुल गांधी ऑनलाईन सहभागी झाले होते. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावल्याने खटला पुढे सुरू आहे. या खटल्याची समाज माध्यमांवर जोरदार चर्चा आहे.

या खटल्यात आता नवा ट्वीस्ट येण्याची शक्यता आहे. भारतीय कायद्यातील तरतुदीनुसार एखाद्या व्यक्तीविषयी वक्तव्य अथवा विधान केल्यास ते संबंधित व्यक्ती पुरतेच मर्यादित असते. अन्य नागरिक अथवा लोक त्या वक्तव्याविषयी न्यायालयात खटला दाखल करू शकत नाही. तसा खटला केल्यास तो बाद होऊ शकतो.

काँग्रेस (Congress) नेते राहूल गांधी यांच्या विरोधात नाशिकच्या सेशन न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेत ज्येष्ठ विधीज्ञ जयंत जायभावे यांनी राहुल गांधी यांच्या वतीने बाजू मांडली. राहुल गांधी यांना खटल्यात अनुपस्थित राहण्याची परवानगी त्यांनी मागितली. त्यानुसार राहुल गांधी यांना टेली कॉन्फरन्सद्वारे न्यायालयाच्या कामकाजात सहभागी होता येणार आहे.

संबंधित खटल्याबाबत वरिष्ठ न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याची सुनावणी पुढील महिन्यात होईल. अखटल्यात संबंधित आरोप रद्द करण्यात यावे. खटला दाखल करणाऱ्या व्यक्तीचा सावरकर यांच्याशी थेट कोणताही संबंध नसल्याचा कायदेशीर मुद्दा यामध्ये मांडण्यात येणार आहे.

विधीज्ञ जायभावे यांनी वरीष्ठ न्यायालयात दाखल केलेल्या पुर्नविचार याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यात हा मुद्दा मान्य झाल्यास राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल केलेली याचिका निष्क्रिय होऊ शकते. कायद्यातील ही शक्कल गांधी यांच्या वतीने काम पाहणाऱ्या कायदेतज्ञांनी शोधून काढली आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत खटला दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यांची मोठी अडचण होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT