NCP leader Adv. Rohini Khadse
NCP leader Adv. Rohini Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

रोहिणी खडसे म्हणाल्या, `शिवसेनेच्या आरोपांना महत्त्व देत नाही`

Sampat Devgire

जळगाव : विरोधकांच्या चर्चा, आरोप यांना मी महत्व देत नाही. या भागाचे प्रतिनिधीत्व नाथाभाऊ (Eknath Khadse) करतात. त्यांच्यामुळे येथे विकास झाला. लोकांच्या ते संपर्कात आहेत. त्यामुळे (Shivsena) विरोधकांनी कितीही राजकीय आरोप केले तरी मतदार विकासासाठी आमच्यासोबत राहतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या अॅड. रोहिणी खडेस (Adv. Rohini Khadse) म्हणाल्या.

बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान आहे होत आहे. यासंदर्भात शिवसेना व भाजपमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप झाले. शिवसेनेच्या आरोपांबाबत त्या म्हणाल्या, मागील निवडणुकीतील तेरा जागांमध्ये देखील मतदारांचा कौल पाहता आणि आत्ताच्या चौर जागांवर मतदार राजा जो कौल आम्हाला देत आहे, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला बोदवड नगरपंचायतीत एक हाती सत्ता येईल हा मला विश्वास आहे.

त्या पुढे म्हणाल्या, मी या चर्चेकडे किंवा बातम्यांकडे फारसे गांभिर्याने पहात नाही, कारण गेल्या तीस वर्षाचा जर विचार केला तर आमचे असे मत आहे की, तुम्ही देखील विचार केला तर आमच्या विरोधात इतर सर्व पक्ष असे चित्र राहिले आहे. राजकीय गणित वाचारात घेतले तर आम्हाला आमच्या कामावर व पक्षाच्या कामावर विश्वास आहे. इतर पक्ष काय करतात, त्यापेक्षा आपण आपल्या लोकांपर्यंत पोहोचणे महत्वाचे आहे. ते आम्ही आमच्या माध्यमातून करतो आहे. मला माझ्या व आदरनीय नाथाभाऊंच्या, रवींद्र भैय्या यांच्या कामावर विश्वास आहे, बाकी इतरांवर टिपणी करणे मला स्वतःला योग्य वाटत नाही. त्यात मला रस देखील नाही.

रोहिणी खडसे म्हणाल्या, माझ्या वाहनावर जो हल्ला झाला, त्यात शिवसेनेच्या लोकांची नावे दिली होती त्या शिवसेनेच्या नेत्यांची नावे होती त्यांना या निवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी त्यांना अडकवण्यात आला असा शिवसेनेचा आरोप आहे. त्याबाबत विचारले असता, रोहिणी खडसे म्हणाल्या, याबाबत माझा पोलिस यंत्रणेवर विश्वास आहे. ते ईपले काम योग्य रितीने करीत आहे. ते आपले काम करतील. त्यातून जे काही सत्य असेल ते लोकांसमोर येईलच. ते येणार याचा देखील मला विश्वास आहे कारण मला पोलिस व न्याय यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे.

विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी विकासाला मतदान होईल असे सांगितले. त्या म्हणाल्या, यासंदर्भात मी मतदारांना एव्हढेच आवाहन करेन की, गेले तीस वर्षे नाथाभाऊ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. त्यांना जीथे जीथे आवश्यक असेल तीथी तीथे ते हजर राहतात. काम करतात. लोकांच्या संपर्कात असतात. मतदारसंघात जो काही विकास झाला, रस्ते, पूल पाण्याच्या संदर्भातील जे काही कामे असतील ती त्यांनी केली आहेत. ज्या काही योजना या भागासाठी मंजूर झाल्या त्या नाथाभाऊंमुळे झाले. त्यामुळे नागरिकांनी, मतदारांनी विकासाला मत द्यावे, मला सहकार्य करावे ही विनंती मी करीत आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT