Shirdi Beggars Death Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shirdi Beggars Death : शिर्डीतील चार भिक्षेकऱ्यांचा मृत्यूनं खळबळ; उपचारासाठी बांधून ठेवल्याचा आरोप

Four beggars Shirdi Visapur Ahilyanagar Shrigonda tragically passed away : अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर इथं बेगर होम ठेवलेल्या शिर्डीतील चार भिक्षेकरांचा मृत्यू झाला असून, सहा जणांची प्रकृती अस्वस्थ आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar Shrigonda news : विसापूर (ता. श्रीगोंदा) इथल्या बेगर होम ठेवलेल्या शिर्डीतील चार भिक्षेकरांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. अशोक बोरसे, सारंगधर वाघमारे, प्रवीण घोरपडे, इसाक शेख, अशी मयत झालेल्या भिक्षेकरांची नावं आहेत.

त्यांच्याबरोबर असलेल्या आणखी सहा जणांची प्रकृती खालावलेली आहे. जिल्हा रुग्णालय आणि विसापूरच्या बेगर होम प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या भिक्षेकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा, मयतांच्या नातेवाईकांनी केला.

शिर्डीतील (Shirdi) भिक्षेकऱ्यांना पकडून विसापूर (ता. श्रीगोंदा) इथल्या बेगर होममध्ये ठेवण्यात आलं होते. त्यातील दहा जणांची प्रकृती खालवल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रविवारी दाखल करण्यात आले. परंतु त्यातील चौघा भिक्षेकरांचा आज मृत्यू झाला. इतर सहा जणांची प्रकृती खालावलेली आहे.

उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या भिक्षेकर्‍यांना जिल्हा रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी बांधून ठेवलं होते. तसंच त्यांना पाणी देखील दिले जात नव्हते. त्यातूनच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप भिक्षेकऱ्यांच्या नातेवाईकांना केली. जिल्हा रुग्णालय आणि विसापूरच्या बेगर होम प्रशासनाने केलेल्या हलगर्जीपणावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मयत भिक्षेकऱ्यांच्या नातेवाईकांनी घेतली आहे.

साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या हत्येनंतर शिर्डीतील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी जिल्हा पोलिस दल, नगर परिषदेने अवैध व्यवसायिकांविरोधात मोहीम सुरू केली. अवैध व्यवसायांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी आणि शिर्डीतील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई सुरू आहे.

यातून शिर्डीतील भिक्षेकऱ्यांविरोधात देखील कारवाई करण्यात आली. भाविकांना अडवून, त्यांच्याकडून पैसे घेऊन नशा करणाऱ्या 60 पुरूष आणि 12 महिला, अशा एकूण 72 भिक्षेकऱ्यांना प्रशासनाने ताब्यात घेतले. या भिक्षेकर्‍यांची आरोग्य तपासणी करत, त्यांना न्यायालयाच्या आदेशाने विसापूर (ता. श्रीगोंदा) इथल्या बेगर होममध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यातील दहा भिक्षेकऱ्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना उपचारासाठी रविवारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातीलच चौघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

म्हणून त्यांना बांधलं...

दरम्यान, मयत झालेल्या भिक्षेकर्‍यांच्या मृत्यूमागील कारण जिल्हा शल्यचिकित्सक नागेश चव्हाण यांनी सांगितले. जे मयत झाले आहेत, त्यांना अनेक व्याधी होत्या. नशेबाजीमुळे त्यांना आधीच गंभीर आजारांनी ग्रासलेले होते. त्यात ते उपचारासाठी प्रतिसाद देत नव्हते, म्हणून त्यांच्या दोन बोटांना बांधलं होतं. वैद्यकीय प्रोसीजर असते, असे चव्हाण यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT