Nagpur News : पंधरा दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या रोज बातम्या धडकत होत्या. दोन्ही नेत्यांकडून तसे संकेतही दिल्या जात होते. उद्धव ठाकरे यांनी बातमची देतो असे सांगून आणखी या चर्चेला आणखीच खतपाणी घातले होते. मात्र, गुरुवारी (ता.12) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज ठाकरे यांच्या भेटीने यात अचानक ट्विस्ट आले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दोन्ही भावांना भाजपला एकत्र येऊ द्यायचे नसल्याचा आरोप केला आहे. दोन्ही भाऊ एकत्र आल्यास भाजपला परवडणार नाही. त्यामुळे त्यांना एकत्र येऊ द्यायचे नाही अस भाजपने ठरवल्याचे या भेटीगाठीवरून दिसते असेही ते म्हणाले.
विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, राज-उद्धव युतीवर यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो त्यांचा अधिकार आहे, त्यात प्रतिक्रिया देण्याचे कारण नाही. राज ठाकरे यांनी कोणासोबत जावे आणि जाऊ नये याचा निर्णय त्यांनाचा घ्यायचा आहे. नागपूरमध्ये बोलताना दोन दिवसांपूर्वी त्यांनी ‘कब बाप मरेगा, कल बैल बटेगे‘ असे सांगून दोघा भावांची युती होणे शक्य नाही असेही सुचित केले होते. आज मात्र मुख्यमंत्री व राज ठाकरे यांच्या राज्यात खळबळ उडाली आहे
वेगवेगळ्या शंका आणि तर्कवितर्क व्यक्त केल्या जात आहे. दोन भावांच्या युतीकडे भाजपच नव्हे तर राज्यातील सर्वच पक्षाचे लक्ष लागले होते. यावर वडेट्टीवार म्हणाले, ठाकरे बंधुंच्या एकत्रिकरणाचे आम्ही स्वागत केले होते. कुटुंब एकत्र येणार असेल तर त्याला आमचे समर्थन होते.
देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट राजकीय होती की वैयक्तिक होती याची माहिती आपल्याला नाही. मात्र, ठाकरे बंधू एकत्र येणारे हे भाजपला परवाडणारे नव्हते हे मात्र नक्की. ते भाजपला होऊ द्यायचे नाही. ईडीची भीती दाखवून राज ठाकरे यांना दूर केले जाईल ही शंकाही जोरात होती. मात्र या भेटीगाठीने राज ठाकरे यांच्यावरच्या विश्वासहर्तेवर प्रश्न उपस्थित होऊ शकतात.
मराठी माणूस एकत्र येण्यासाठी सुरू झालेली प्रक्रिया यामुळे थांबू शकते. यात मराठी माणसाचे नुकसान आहे. उद्धव ठाकरे सेना आणि मनसे युती होणार नाही अशी खेळी खेळली जात असल्याचीही शंका वडेट्टीवार यांनी बोलून दाखवली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारत-पाकिस्तान युद्धाला व्हिडीओ गेम संबोधून वाद ओढावून घेतला आहे.
यावर वडेट्टीवार म्हणाले, ते काय बोलले हे मी ऐकले नाही. ॲापरेशन सिंदूर झाल्यावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी हल्ला करणार आहोत, जागा रिकामी करा असे पाकिस्तानला सांगितले होते. हे त्यांनीच सांगितले आहे. त्यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हल्ला करण्यापूर्वी कोणी शत्रू राष्ट्राला कळवते की आम्ही ॲापरेशन करणार आहो ते. हेच नाना पटोले बोलले. यात गैर काय असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.