Nitesh rane, Eknath Shinde, Uddhav Thackeray
Nitesh rane, Eknath Shinde, Uddhav Thackeray  Sarkarnama
विदर्भ

Nitesh Rane: '' जे जे बाळासाहेबांचं, ते ते शिंदेंचं; वाटीभर पक्षानं..''; नितेश राणेंनी ठाकरेंना डिवचलं

सरकारनामा ब्यूरो

Nitesh Rane Latest News : मुंबई महापालिकेतील शिवसेनेचं कार्यालय शिंदे गटानं ताब्यात घेतल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. संजय राऊतांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिंदे गटाच्या या कृतीवर सडकून टीका केली जात आहे. यातच भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जे जे बाळासाहेबांचं आहे, ते ते एकनाथ शिंदेंचं आहे असं म्हणत वाटीभर पक्षानं आता हट्ट सोडावा अशा शब्दांत उध्दव ठाकरे आणि त्यांच्या गटावर बोचरी टीका केली.

त्याच टीकेला आता ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

भाजप नेते व आमदार नितेश राणे म्हणाले, मुंबई महापालिकेतील ते कार्यालय बाळासाहेब ठाकरेचं कार्यालय आहे. त्यामुळे त्यांचा अधिकार ते घेणार आहेत. जे बाळासाहेबांचं आहे ते सर्व शिंदेचं आहे. उद्धव ठाकरे यांचा वाटी एवढा ग्रुप शिल्लक राहिला असून त्यांनी आता हट्ट सोडला पाहिजे.

नितेश राणे यांनी वेड्यांचा पक्षप्रमुख वेडा! असं म्हणत उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. “ठाकरेगट म्हणजे दोस्ताना पार्ट 3!”आहे.

तसेच संजय राऊत याचा वरचा भाग सटकलेला आहे. आपल्या नागपूर किंवा राज्यात वेड्यांचं रुग्णालय असेल तिथे संजय राऊत यांना ठेवा. त्यांची थर्टी फस्टची पार्टी वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये व्हायला हवी" असंही नितेश राणे म्हणाले.

राणे म्हणाले, "मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या कार्यालयावरून काल राडा झाला. शिंदेगटाने या कार्यालयावर ताबा मिळवला. त्यावरही नितेश राणे बोलले. ते बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं कार्यालय आहे. त्यांचा अधिकार ते घेणारच. जे बाळासाहेबांचं आहे ते सर्व शिंदेचे आहे. उद्धव ठाकरे यांचा वाटी एवढा ग्रुप राहिला आहे. त्यामुळे त्यांनी हट्ट सोडला पाहिजे,"

बाळासाहेब ज्या ज्या ठिकाणी बसायचे तिथं एकनाथ शिंदेंचा अधिकार आहे. आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिल्लक राहिलेले जे कुणी महापालिकेतील कार्यालयात गेले असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही नितेश राणेंनी यावेळी केली आहे.

राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, मुंबई महापालिकेतील शिवसेनेचं कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रकार म्हणजे दादागिरीचा प्रकार आहे. आणि ही मस्ती सत्तेच्या जोरावर सुरू आहे. त्यामुळे जनतेनेच ती उतरवली पाहिजे. शिंदे गटाला कार्यालय असणं वावगं नाही. पण त्यांना हवं होतं तर दुसरं कार्यालय बघायचं होतं असेही दानवे यांनी यावेळी सांगितले.

'' तुम्ही ठोकशाहीने राज्य करणार असाल, तर...''

ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊतांनी मुंबई महापालिकेतील शिवसेेनेचं कार्यालय ताब्यात घेणार्या शिंदे गटावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले, गद्दार हे घुसखोरच आहेत. त्यांना स्वत:चं अस्तिव नाही. ते कुठेही घुसत असतात. 

मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयात घुसखोरांची टोळी घुसते. ते कार्यालयाचा ताबा घेतात. त्यानंतर पालिका प्रशासन मुंबई महापालिकेतील सर्व पक्षाच्या कार्यालयाला सील करण्यात आलं आहे. कोणत्या कायद्याने सील लावलं गेलं? नोटीस दिली का? ही मनमानी आहे. याला कायद्याचं राज्य म्हणत नाही. या राज्यात लोकशाही राहिली आहे का?

तुम्ही ठोकशाहीने राज्य करणार असाल. तर, ठोकशाहीच्या राज्यात शिवसेनेचं प्रगस्तीपुस्तक चांगल्या मार्काचं आहे. ठोकशाहीत शिवसेनेची कोणी स्पर्धा करू नये. मुंबई पालिकेतील कार्यालय शिवसेनेचंच राहणार आहे असा इशाराही राऊतांनी शिंदे गटाला दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT