Devendra Fadanvis, Atul Londhe and Chandrakant Patil
Devendra Fadanvis, Atul Londhe and Chandrakant Patil Sarkarnama
विदर्भ

मनसेच्या भोंग्यातून भाजपचा आवाज येतोय; फडणवीस, पाटील खुलासा करतील का?

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उचललेला भोंग्यांचा मुद्दा काही केल्या शांत होण्याचे नाव घेत नाहीये. राज ठाकरेंच्या आवाहनानंतर उत्तर प्रदेश सरकारने भोंगे उतरविले आणि महाराष्ट्रातही भाजपने मनसेच्या भोंग्यात आपला आवाज मिसळवला. त्यामुळे भोंग्यांचा मुद्दा नेमका कुणाचा असा प्रश्‍न पडल्यावाचून राहात नाही. असे असताना भाजपच्या एका खासदाराने ‘माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही’, अशी भूमिका घेतली आहे.

भोंग्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरे (Rयांना राज्यात भाजपने साथ दिली आहे आणि त्यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी भाजपचे उत्तर प्रदेश सरकार रेड कार्पेटवर स्वागत करण्यात मग्न आहे. मात्र उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी जाहीर माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. आपल्याच पक्षाच्या खासदाराच्या या भूमिकेवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)चंद्रकांत पाटील (Chandakant Patil) यांनी खुलासा करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केली आहे.

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना लक्ष्य करण्याचे राजकारण केले आहे. रेल्वे परीक्षेला आलेल्या उत्तर भारतीय परीक्षार्थ्यांचा मारहाण केली, फेरीवाले, पाणीपुरी विकणारे, फळे भाजी विकणाऱ्या गोरगरीब उत्तर भारतीयांनाही मारहाण केली. राज ठाकरेंनी आज हिंदुत्वाची पताका घेऊन हनुमान चालिसा, लाऊडस्पिकर, महाआरतीचे मुद्दे घेताच त्यांना महाराष्ट्र भाजपने साथ दिला पण राज ठाकरेंची उत्तर भारतीयांबद्दलची भूमिका महाराष्ट्र भाजपतला मान्य आहे का? भाजपचे खासदार ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंच्या माफीची मागणी केली केली आहे त्यावर राज्यातील भाजप नेते फडणवीस व चंद्रकांत पाटील यांची भूमिका काय? हे जनतेला समजले पाहिजे.

मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, या शहरात येऊन रोजीरोटी कमावण्याचा सर्वांना सांविधानिक अधिकार आहे त्याचे रक्षण केवळ काँग्रेस पक्ष व काँग्रेस सरकारनेच केले आहे. केवळ मतांसाठी रामाचे, हनुमानाचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या भाजपने एका समाजाला दुसऱ्या समाजासमोर उभे केले. रवी राणा, नवनीत राणा, राज ठाकरे या बी टीमना भाजपने पुढे करून राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचे काम केले आहे. मतांच्या स्वार्थासाठी काहीही करणाऱ्या भाजपने राज ठाकरेंची नवी भूमिका व त्यांच्याच पक्षाच्या खासदाराने केलेला विरोध यावर भूमिका स्पष्ट करावी असे लोंढे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT