Bacchu Kadu, Eknath Shinde & chandrakant Patil. Sarkarnama
विदर्भ

Amravati : भाजपच्या नेत्याने अगदी ठासून सांगितले, बच्चू कडू कुठेही जाणार नाहीत

Amar Ghatare

Bacchu Kadu : अमरावती जिल्ह्यात लोकसभेच्या जागेवरून चांगलेच राजकारण तापत आहे. अनेक पक्ष अमरावतीच्या लोकसभा मतदार संघातील जागेवर आपला दावा सांगत आहेत. त्यात प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते तथा अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांचादेखील समावेश आहे. कडू यांनीही अमरावती लोकसभेच्या जागेवर महायुतीमध्ये आपला दावा सांगितला आहे.

विद्यमान खासदार नवनीत राणा यांना त्यांनी प्रहार जनशक्ती पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढावी किंवा अमरावतीची जागा ‘प्रहार’ला द्यावी असे नमूद केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीमधून महायुतीच्या उमदेवार या नात्याने नवनीत राणा निवडणूक लढतील असे संकेत दिले आहेत. त्यामुळे अमरावतीवरून महायुतीत स्पर्धा सुरू आहे. अशात बच्चू कडू महायुतीला सोडून जाणार नाहीत, असा दावा भाजपच्या एका नेत्याने केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अलीकडेच अमरावतीच्या दौऱ्यावर होतो. त्यावेळी त्यांनी बच्चू कडू यांनी त्यांच्या घरी जात भेट घेतली. त्यामुळे बच्चू कडू माहायुतीतून बाहेर पडतील अशा चर्चांना उधाण आले होते. बच्चू कडू कुठेही जाणार नाहीत. एखाद्या कुटुंबामध्ये एखादा मुलगा हट्ट धरतो. हट्ट प्रकट करतो. त्या कुटुंबाच्या शिस्तीच्याबाहेर तो मुलगा नसतो. बच्चू कडू आमचे असे मित्र आहेत. ते मनात काहीच ठेवत नाहीत. मनात आले की ते बोलून टाकतात. पण याचा अर्थ ते बाहेर पडतील किंवा लोकसभा लढवतील असा होत नाही, असे भाजपचे नेते, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठामपणे सांगितले आहे.

बच्चू कडू यांच्या बाबतीत विरोधकांचे मनातील मांडे खाणे सुरू आहे. हे मांडे त्यांना प्रत्यक्षात कधीच खायला मिळणार नाहीत, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बच्चू कडू यांच्या निवासस्थानावर जाऊन त्यांची भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांचा रोख बदलला. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे अद्यापही अस्पष्ट आहे. लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर ही भेट झाल्याने त्याला महत्त्वाचे मानले जात आहे. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे बच्चू कडू व शरद पवार दोघेही सांगत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीत असतानाही गेल्या काही महिन्यांपासून बच्चू कडू यांनी सरकारवर अनेकदा ताशेरे ओढले आहेत. अनेकदा त्यांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेतली आहे. आंदोलनाचा इशाराही दिला आहे. मराठा आंदोलन असो की शेतकऱ्यांचे प्रश्न यावर त्यांनी सरकारलाच धारेवर धरले आहे. सरकार विरोधात रस्त्यावर उतरण्याची भाषाही त्यांनी अनेकदा केली आहे. त्यामुळे बच्चू कडू सरकारसोबत आहेत की विरोधात असा प्रश्न अनेकांना पडतो.

या सर्व परिस्थितीत आता चंद्रकांत पाटील यांनी बच्चू कडू कुठे जाणार नाही असं जरी चंद्रकांत पाटील यांनी आमदार बच्चू कडू कुठेही जाणार नसल्याचा ठाम दावा केला आहे. अमरावतीच्या जागेसह लोकसभेसाठी बच्चू कडू यांनी तीन जागा तर विधानसभेच्या निवडणुकीत 15 जागा मिळाव्या, असा प्रस्ताव महायुतीला दिला आहे. त्यामुळे जागा वाटपावरून रस्सीखेच होणार का असा प्रश्न निर्माण होणार आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT