Nagpur News : विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. ईव्हीएमध्ये छेडछाड केल्याची शंका काँग्रेसचे नेते व्यक्त करीत आहे. काँग्रेसच्या अनेक पराभूत उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल केली. निवडणूक आयोगाच्या कारभारावर शंका व्यक्त करून सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे. मात्र, यात काही घोटाळा वैगरे काही झाला नाही. आपणच कमी पडलो हे कबूल करा असे सांगून माजी मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे काँग्रेसचे (Congress) निरीक्षक रणजित कांबळे यांनी काँग्रेसलाच घरचा आहेर दिला.
नागपूर ग्रामीण काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी(ता.30) रणजित कांबळे यांनी घेतली. आगामी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी त्यांनी रोखठोक मत व्यक्त केले. ते म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीत मीसुद्धा पराभूत झालो आहो. मी कमी पडलो त्यामुळे पराभूत झालो हे मी कबूल करतो. तुम्हीसुद्धा करा. केवळ स्वतःच्या समाधानासाठी ईव्हीएमवर खापर फोडू नका.
ईव्हीएममध्ये (EVM) घोटाळा होऊ शकत नाही. संपूर्ण देशभर ईव्हीएम मॅनेज करणे अशक्य अशी बाब आहे. आता ही कारणे सोडा. कामाला लागा. त्याशिवाय आपला पक्ष मजबूत होणार नाही. एकमेकांची उणीदुणी काढत बसू नका. गटबाजी सोडा. जे झाले ते विसरून जा. आता नव्या निवडणुकांना आपल्याला सामोरे जायचे आहे. त्यापूर्वी आपला पक्ष कसा मजबूत करता येईल याकडे लक्ष द्या असा सल्लाही कांबळे यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.