Datta Meghe Sarkarnama
विदर्भ

Datta meghe : या संमेलनामुळे साहित्यातील सकारात्मक विचार खालच्या लोकांमध्ये पाझरतील

Atul Mehere

नागपूर : वर्धा हा महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आहे. या भूमीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, याचा अत्याधिक आनंद आहे. या निमित्ताने येथे सर्व साहित्यिक येणार आहेत. साहित्यामधील चांगले विचार अशा संमेलनांमुळे खालच्या लोकांपर्यंत पाझरतात, असे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे म्हणाले.

वर्धा (Wardha) येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात देशभरातील साहित्यिकांसोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, (Nitin Gadkari) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासारखी मंडळीदेखील येणार आहे. याशिवाय कॉंग्रेस (Congress) आणि इतरही सर्व पक्षांचे लोक येथे येऊन एकदिलाने संमेलनात सहभागी होणार आहेत. साहित्य आणि समाजकारण यांचा आपसात काय संबंध आहे, याची उकल या संमेलनातून होणार आहे. लोकांमध्ये एक सकारात्मक संदेश या माध्यमातून देता येईल आणि या संमेलनाचा स्वागताध्यक्ष होता आले, या अत्याधिक आनंद झाला असल्याचे दत्ता मेघे (Datta Meghe) यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.

वर्धा जिल्ह्यात साहित्यामध्ये रस घेणारे अनेक लोक आहेत. पण यापूर्वी या जिल्ह्याला संधी मिळाली नव्हती. नागपूरच्या विदर्भ साहित्य संघामध्ये अनेक कार्यक्रम होत असतात. पण येवढे मोठे संमेलन वर्धा येथे घ्यायचे म्हणजे मोठ्या खर्चाची बाब आहे. त्यासाठी अनेक लोकांची मदत घ्यावी लागणार आहे आणि या कामी सर्व धर्मीय, सर्व समाजातील लोक मदत करू शकतात आणि यानिमित्ताने एक चांगले सांस्कृतिक वातावरण तयार होईल, असे दत्ता मेघे यांनी सांगितले.

स्वागताध्यक्ष म्हणून जेव्हा मला विचारणा करण्यात आली, तेव्हा मी आयोजकांना सांगितले की, कुणाही मोठ्या साहित्यिकांना तुम्ही हा मान द्या, पण त्यांनी म्हटले की, तुम्हालाच स्वागताध्यक्ष करायचे आहे. संमेलन वर्धा जिल्ह्यात असल्यामुळे मी हो म्हटले इतरत्र असते तर मला शक्य झाले नसते. मी एक सामान्य कार्यकर्ता होतो. पण लोकांची कामे करता करता त्यांनी नेता बनवले आणि राजकारणात तब्बल ४० वर्ष काम केले. पार्लामेंटमध्ये दोन वेळा मंत्री होतो. महाराष्ट्रातही चार वेळा मंत्रिपदं भूषविली आहेत. त्या सर्व कार्याच्या बळावर आज आयोजकांनी स्वागताध्यक्षपदाचा मान दिला, याचा आनंद आहे, असेही दत्ता मेघे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT