ajit pawar
ajit pawar sarkarnama
विदर्भ

दोघेच कारभारी, मुंबईत बसून निर्णय घेऊ नका : अजितदादांकडून सरकारचा पंचनामा

सरकारनामा ब्युरो

गडचिरोली : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते अजित पवार (ajit pawar) आज (गुरुवार) गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील शिवणे गावात बांधावर जाऊन त्यांनी पुरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. (Ajit pawar latest news)

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबाबत शेतकऱ्यांची विचारपूस केली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नुकसानाचे पंचनामे करून पूरग्रस्तांना आवश्यक ती आर्थिक मदत तातडीनं राज्य सरकारने करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर (eknath shinde)निशाणा साधला.

"मुंबईत बसून निर्णय घेऊ नका. मुख्यमंत्र्यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी करावी, तातडीनं अधिवेशन घेण्याची गरज आहे. भितींना ओलावा आलेल्या घरांचाही पंचनामा करावा," अशी मागणी त्यांनी केली. गडचिरोलीमध्ये १० लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे, असे पवारांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले,"मुख्यमंत्री शिंदे म्हणतात सरसकट पंचनामे करायला सांगितले पण शेतकरी म्हणतात पंचनामे झाले नाहीत. दहा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यावर उपाययोजना व्हायला हव्या. अन्य मागण्या कशा पूर्ण होतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत,"

"सरकारने रोप आता दिली तर उपयोग नाही, कारण दोन महिने ऋतू पुढे गेला. पावसाळा बंद झाला तर रोपांना पाणी मिळणार नाही. या समस्या जाणून घेण्यासाठीच मी सर्वांना बरोबर घेत पाहणीसाठी आलो. मी गडचिरोलीनंतर चंद्रपूर, वर्धा, नांदेड, बीडमध्येही शेतबांधावर जाणार आहे," असे पवार म्हणाले.

दोघेच कारभार करीत आहेत..

अजित पवार म्हणाले, "वेगवेगळ्या भागात वेगवेगळे पीक आहेत. पाऊस बंद झाल्यानंतर शेतकरी पीक घेत नाहीत त्या-त्या भागात असे प्रश्न आहेत. येत्या अधिवेशनात मी याबाबत आवाज उठवणार आहे. हे मी शेतकऱ्यांनाही आश्वासन दिले आहे. मी नागपूरमध्ये सांगितले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेच कारभार करीत आहेत,"

कलेक्टरला प्रश्न विचारणार

पंचनामे अजून का केले नाही कलेक्टरला प्रश्न विचारणार असून कारणेही जाणून घेणार आहोत,शिंदे फडणवीस सरकारने पालकमंत्र्यांची नेमणूक केली नाही, मंत्रिमंडळ गठीत केले नाही. हे तात्काळ करायला हवे त्यामुळे भर पावसाळ्यात अडचणीवर मात करता येईल आणि शेतकऱ्यांची सोय होईल. " असे पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले..

  • कर्ज तरी माफ करा किंवा कर्जाचे पुनर्गठन करावे, पण पीकच शेतात नाही

  • नविन आणि जूने कर्ज फेडणार कसे आदी शेतकऱ्यांच्या समस्या आहेत.

  • ज्यांचे पीक गेले, त्यावर सरकार काय निर्णय घेणार हे मी सरकारला विचारणार आहे.

  • अव्वाच्या सव्वा नव्हे तर व्यवहार्य मागण्या आम्ही त्यांच्याकडे करु, कारण आम्हालाही सरकारच्या समस्या माहित आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT