eknath shinde nana patole.jpg sarkarnama
विदर्भ

Nana Patole : "नाना पटोलेंमुळे आमची महाविकास आघाडीची सत्ता गेली", शिंदे गटातील नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

Akshay Sabale

महाविकास आघाडीची सत्ता नाना पटोले यांच्यामुळे गेली. आमचे सरकार गडगडायला नाना पटोले कारणीभूत आहेत, असा खळबळजनक दावा विधानपरिषदेच्या उपसभापती, शिवसेनेच्या ( शिंदे गट ) नेत्या, नीलम गोऱ्हे यांनी केला आहे.

'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला होता. "लाडकी बहीण' योजनेच्या प्रचारासाठी चारशे कोटींहून अधिक निधीची उधळपट्टी करण्यात आली. लोकांनी सांगितलं, तुमचे दीड हजार नको, आमच्या मुली सुरक्षित हव्या आहेत. महाराष्ट्रातील सरकार असंवैधानिक आहे," अशी टीका नाना पटोले ( Nana Patole ) यांनी केली होती.

याला नीलम गोऱ्हे ( Neelam Gore ) यांनी प्रत्युत्तर देत चांगलाच समाचार घेतला आहे. त्या नंदूरबार येथे पत्रकार परिषदेत संवाद साधत होत्या. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, "आमची महाविकास आघाडीची सत्ता नाना पटोले यांच्यामुळे गेली. आमचे सरकार गडगडायला नाना पटोले कारणीभूत आहेत. नाना पटोले हे विनोदाचा भाग आहेत. त्यांच्या शब्दाला विनोदापलीकडे पाहण्याशिवाय काही अर्थ नाही."

"महिला मिळणाऱ्या योजनेमुळे महिला आनंदित झाल्या आहेत. पण, नाना पटोले यांना ते बघवत नाही का?" असा सवाल नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केला आहे.

"राज्यात होणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना अतिशय गंभीर आहेत. त्यासाठी महिलांना शस्त्र दिले पाहिजेत. महिला धाडसाने पुढे येऊन गुन्हा नोंदवत आहेत, हे महत्त्वाचं आहे. महिला सुरक्षेसाठी योजना मुख्यमंत्री आणणार आहेत," अशी माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT