Nagpur News : सर्वे कंपन्या आणि एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा येणार आहे. त्याच्यावर विश्वास ठेवायचा किंवा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. महाविकास आघाडीला एक्झिट पोल मान्य नाही. मात्र, भाजपकडे (BJP) स्वतःची यंत्रणा आहे. राज्यातील सुमारे एक लाख बुथवर आमचे कार्यकर्ते होते. त्यांच्याकडून आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात महायुतीचे 160 आमदार निवडून येणार असल्याचं भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
भाजपने राज्यातील सर्व बुथवर विश्वासून कार्यकर्ते नेमले होते. 1 लाख 7 हजार बुथवर आमची माणसे होती. त्यांच्या मार्फट डेटा गोळा केला आहे. मतदान आटोपल्यानंतर कॉलिंग एजंटने एक चार्ट तयार केला होता. त्यावर सर्वाच नेत्यांनी विश्लेषण केले. अचूक अंदा वर्तवला आहे. त्यानुसार 160 उमेदवार महायुतीचे (Mahayuti) निवडून येणार असल्याचा दावाही यावेळी पाटील यांनी केला.
कमळ, घड्याळ आणि धनुष्यबाण हे चिन्ह महायुतीच्या जमेची बाजू आहे. काही सर्वे कंपन्यांनी 225 जागा महायुतीला दाखवत आहे. यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. ही अतिशयोक्ती झाली. मात्र, आमचा आकडा विश्वासहार्य असाच आहे. आमच्या विचारांच्या पक्षांचे जे उमेदवार निवडून येतील ते आमच्यासाठी बोनस ठरणार असल्याचेही पाटील म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह, जे.पी. नड्डा यांनी महाराष्ट्राचे सर्व भौगोलिक ज्ञान आहे. कोणाची क्षमता किती हेसुद्धा ठाऊक आहे. जातीय समीकरणांचाही अभ्यास आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही मोदी यांच्यावर विश्वास आहे. जे ठरवतील ते सर्वांचेच हिताचे राहणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोणाला करायचे यावर आमच्यात कुठलेच दुमत राहणार नाही, असाही दावा यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.