Manoj Jarange Sarkarnama
विदर्भ

Maratha Reservation News : सरकारला पश्चातापाची वेळ आणली नाही तर नाव बदलून ठेवीन !

सरकारनामा ब्यूरो

Maratha Reservation News : मराठा आरक्षणाचा मुद्दा काही केल्या सुटण्याचे नाव घेत नाहीये. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलने करून सरकारला जेरीस आणून ठेवले होते. आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगे पाटलांनी सरकारला पुन्हा कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे. येत्या रविवारी (ता. 24) अंतरवाली सराटीत निर्णायक बैठक ठेवण्यात आली आहे. या बैठकीनंतर सरकारला पश्चातापाची वेळ आणली नाही तर नाव बदलून ठेवीन, असा इशारा देण्यात आला आहे.

राज्यासह देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सर्व पक्षांकडून जोरदार तयारीही सुरू आहे. अनेक पक्षांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असून, पक्षाने प्रचाराचा नारळही फोडला आहे. अशातच मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीपूर्वी समाजाच्या बैठकीचं आयोजन केले आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या बैठकीकरिता अकोला जिल्ह्यातील सकल मराठा समाज सहभागी होणार आहे. यासाठी आवाहनदेखील करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे, तर दुसरीकडे मराठा समाजाकडून निवडणुकीपूर्वी बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. 24 तारखेची अंतिम बैठक आणि ठोस बैठक असेल. सरकारला पश्चातापाची वेळ आणली नाही तर नाव बदलून ठेवीन, असा इशारा जरांगे पाटलांनी यापूर्वीच सरकारला दिला आहे. बैठकीनंतर सरकार विचार करेल की, अंमलबजावणी करणं परवडलं असतं, असंही त्यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की, 24 तारखेला आम्ही राज्यातील मराठा समाजाची बैठक लावली आहे .

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बैठकीत आम्ही आमची पुढची दिशा ठरवणार आहे. या बैठकीला सर्व तज्ज्ञ हजर राहणार आहेत. समाजाकडून दोन दिवस तिथे जेवणाचीसुद्धा व्यवस्था केली आहे, अशी माहिती जरांगेंनी दिली आहे. ही प्रचंड मोठी बैठक आणि निर्णायक बैठक असणार आहे. आचारसंहिता लागण्याच्या अगोदर निर्णय घेणार होते. मात्र, घेतला नाही. 24 तारखेला अंतिम बैठक आणि अंतिम निर्णय मराठा समाजाचा असणार आहे. एकमताने ठोस निर्णय घ्यायचा आहे. सरकार कायद्याने खेटत असेल, तर आम्हीदेखील आता सरकारला कायद्याने खेटणार आहोत आणि यावर 24 तारखेला निर्णय होईल.

बैठकीसाठी अकोल्यातील समाज बांधवही जाणार..

24 मार्चची आयोजित करण्यात आलेली बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीला मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे, तर दुसरीकडे राज्यभरातून सकल मराठा समाज या बैठकीला जाणार आहे. यासाठी तसं नियोजनदेखील करण्यात आलं आहे, तर अकोला जिल्ह्यातील मराठा बांधवदेखील या बैठकीत सहभागी होतील. अकोला जिल्ह्यातील मराठा समाजाला बैठकीला उपस्थित राहण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

Edited By : Atul Mehere

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT