Nitin Raut
Nitin Raut sarkarnama
विदर्भ

सध्या अंध भक्तांचा सुळसुळाट; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (Dr. Babasaheb Ambedkar) विचार कायम उपाय सुचवित असतात. यापुस्तकात देखील त्यांनी लोकसंख्येसंदर्भातील विचारांची, धोरणांची माहिती दिली. राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) हे बाबासाहेबांचे भक्त आहेत. भक्त आणि अंधभक्त यात फरक असतो. अंधभक्त फक्त उदोउदो करत सुटतो, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाव न घेता भाजपला (BJP) लगावला.

नितीन राऊत यांच्या 'आंबेडकर ऑन पाप्युलेशन-कंटेंपररी रिलिव्हन्स' या पुस्तकाचे आज वसंतराव देशपांडे सभागृहात प्रकाशन झाले. या कार्यक्रमासाठी उध्दव ठाकरे दूरदृष्यप्रणालीद्वारे मुंबई वरून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात होते. प्रमुख पाहूणे राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लीकार्जुन खरगे, अमेरीकेतील इंडियाना विद्यापीठाचे प्रो. डॉ. केविन डी. ब्राऊन, अनुसूचित जाती आयोगाचे समन्वयक के. राजू व तामिळनाडूचे आमदार सिलिव्हम यावेळी उपस्थित होते.

भक्त हा आपल्या दैवताच्या विचारांवर आयुष्याभराची वाटचाल करतो. त्यांचे विचार त्यांनी कधीच सोडले नाही. ते अंधभक्त नाहीत. बाबासाहेबांचे विचार घेवून पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्याची त्यांची भुमिका कौतुकास्पद, असेही मुख्यमंत्री म्हणाले. बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ घटनाच लिहिली, असे नाही तर त्यांनी पुढे निर्माण होणाऱ्या अडचणी अडथळे दाखविले. त्या अडथळ्यांवर उपायही सूचविले. ज्ञानाचा अथांग सागर असणारे बाबासाहेब सर्वकालीन मार्गदर्शक आहेत. जेव्हा तुम्ही थांबता. काय करावे समजत नाही, त्यावेळी बाबासाहेबांचे विचार मार्गदर्शक ठरतात.

उद्धव ठाकरे म्हणाले, राजाकरणातील व्यक्तीमत्व अभ्यास करून काही लिहिल याबाबत शंका उपस्थित केली जाते. मात्र, राऊत यांनी आपल्या सर्वांचे दैवत असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी अभ्यासूपणे बाबासाहेबांच्या विचारांवर पुस्तक लिहून राजकारणी अभ्यासू असतो हे दाखवून दिले. एक अभ्यासू व्यक्तिमत्व व मंत्रीमंडळातील सहकारी म्हणून राऊत यांचा आपल्याला अभिमान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांचे दैवत आहेत. अशी दैवते किती वर्षांनी, कुठे जन्माला येतात हे सांगता येत नाही. जन्माला आल्यानंतर आयुष्याची वाटचाल करत असतांना अनेक वाटा, पर्याय आपल्यासमोर असतात. त्यातल्या काही वाटा चोखाळायला धाडस लागते. हे धाडस बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात केले म्हणून ते दैवत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT