Maharashtra Politics : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे (BJP) प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनीही शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असे चुकीचे विधान केले आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपने शिवरायांचा अवमान करण्याची सुपारी घेतली असल्याचा आरोप केला.
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या व्यक्तव्यावरून सध्या राज्यात चांगलेच राजकीय पडसाद उमटत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जाणिव पूर्वक चुकीचे विधानं करून त्यांचा अवमान केला जात आहे. आमदार लाड यांनी वादग्रस्त व्यक्तव्य करताना ते वाचून बोलत होते. याचाच अर्थ ते जाणीवपूर्वक बोलले आहे. बाजूला प्रवीण दरेकर बसलेले असताना ते काहीही बोलले नाही. भाजप नेत्यांचेही याबाबत कुठलेच व्यक्तव्य नाही. याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याची सुपारी घेवूनच भाजप नेते बोलत असल्याचा आरोप आमदार मिटकरी यांनी केला.
आता सहनशिलतेपलिकडे!
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्ही लहानपणापासून वाचत आलो आहे. त्याची तोडफोड करून भाजप नेते त्यांचा जाणीव पूर्वक अवमान करतात. आतापर्यंत आम्ही आत्मक्लेष करून महात्मा गांधीजींच्या मार्गाने चालत होतो. आता मात्र सर्व सहनशिलतेपलिकडे गेले आहे. त्यामुळे यापुढे भगतसिंग यांच्या स्टाईलमध्ये उत्तर देवू, असा इशारा आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप नेत्यांना दिला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.