Prakash Ambedkar Sarkarnama
विदर्भ

Vanchit Bahujan Aghadi : प्रकाश आंबेडकर म्हणाले, जोपर्यंत जागावाटप होत नाही, तोपर्यंत...

Atul Mehere

Vanchit Bahujan Aghadi : महाविकास आघाडीत वंचितचा समावेश होत नाही तोपर्यंत कोणत्याच कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे वंचितकडून यापूर्वीही सांगण्यात आले. त्यानंतर महाविकास आघाडीत वंचितचा समावेश झाल्याचे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून जाहीर करण्यात आल्यानंतर वंचितचे नेते महाविकासच्या बैठकीला हजर झाले. मात्र, त्यानंतर दिलेल्या प्रस्तावावर चर्चा होत नसल्याचा आरोप करीत आता पुन्हा प्रकाश आंबेडकर यांच्याकडून 'जोपर्यंत आमचा पक्ष महाविकास आघाडीसोबत अधिकृत युती करत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. महायुती-महाविकास आघाडी यामधील जागावाटपावरून चर्चेच्या फेऱ्या पार पडत आहे. निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. त्यातच महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीतील चर्चेचे गुऱ्हाळ अद्यापही पुढे सरकलेले नाही. यामध्ये वंचितने दिलेल्या प्रस्तावावर चर्चाच होत नसल्याचा आरोप वंचितने वारंवार केला आहे. महाविकास आघाडी आणि वंचितमधील झालेल्या बैठकीत जागावाटपावर कुठलाच तोडगा निघाला नसल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, आज (ता. 9) पार पडणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीतपूर्वी आम्ही सामील होणार असल्याचे वंचितकडून सांगण्यात आले होते. तर प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनीही काल (ता.8) रोजी पत्र पाठवून 'आपण ठरवून आपापसात चर्चा करावी व ९ मार्चच्या बैठकीत तुमची भूमिका मांडावी. आपण बदलाल ही अशा आहे. आपली युती भक्कम व टिकाऊ करण्याचा आमचा प्रयत्न आहे याची आम्ही तुम्हा तिघांना खात्री देत आहोत, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, आता पक्षाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका जाहीर करीत या बैठकीला उपस्थित होणार नसल्याचं म्हटलं आहे. नेमकं चाललंय तरी काय? संभ्रमावस्था महाविकास आघाडी आणि वंचितच्या युतीवरून होऊ लागली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी विरोधात महायुती असा सामना होणार आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीत यावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यात अद्याप याला यश आलेलं नाही. याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेतही सहभागी होणार नसल्याचं म्हटलं आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही अद्यापही महाविकास आघाडीचे भाग झालेलो नाही. सीट सेटलमेंट अद्यापही झालेलं नाही. जागावाटप जर ठरलं तर आम्ही त्यांच्याबरोबर राहू, नाही झालं तर आमचा असणारा संसार वेगळा राहील, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तोपर्यंत आम्ही त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाही. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत आणि शरद पवार यांच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Edited By : Atul Mehere

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT