Prakash Ambedkar, Nana Patole, Uddhav Thackeray and Sharad Pawar Sarkarnama
विदर्भ

Vanchit-Mahavikas Aghadi : ‘त्या’ पत्रानंतर वंचित-महाविकासच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, पण आंबेडकर म्हणतात...

जयेश विनायकराव गावंडे

Vanchit-Mahavikas Aghadi : वंचितच्या महाविकास आघाडीत समावेश करण्यावरून आघाडीतील तिन्ही पक्षाचे एकमत झाल्याचे पत्र प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले. त्यानंतर वंचितचा आता महाविकास आघाडीत समावेश झाल्याची चर्चा ऐकायला मिळाली. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत एक मोठं विधान केले आहे. आंबेडकर म्हणाले, वंचित बहुजन आघाडीचा अद्यापही महाविकास आघाडीत समावेश झाला नाही.

कालच्या (ता. ३०) पत्रावरील नाना पटोले यांच्या सहीला आम्ही महत्व देत नसल्याचे आंबेडकर म्हणाले. ती पटोले यांची वैयक्तिक सही असल्याचंही आंबेडकर यावेळी बोलताना म्हणाले आहेत. अकोल्यात आज (ता. 31 जानेवारी) प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत हे विधान केले आहे. महाविकास आघाडीची काल बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे निमंत्रण वंचित बहुजन आघाडीला देण्यात आले होते.

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर या बैठकीला गेले होते. पुंडकर यांनी वंचितचा अजेंडा सर्वांसमोर ठेवला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांना बाहेर बसवलं. आम्ही चर्चा करून सांगतो, असं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पुंडकर यांना सांगण्यात आलं. त्यानंतर पुंडकर यांना तब्बल 1 तास बैठकीच्या बाहेर बसवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या सर्व घडामोडींनंतर अखेर महाविकास आघाडीकडून एक पत्र वंचितला देण्यात आलं.

या पत्रात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे वंचितला आघाडीमध्ये घेण्यावर एकमत झाले आहे. त्यामुळे वंचितचा समावेश महाविकास आघाडीत झाल्याचं बोललं जात असतानाचा आता प्रकाश आंबेडकर यांनी आज (31 जानेवारी) पत्रकार परिषद घेऊन समावेश झाला नसल्याचे स्पष्ट केलं आहे. आंबेडकर म्हणाले की, कालच्या बैठकीत जागा वाटपावर काय ठरलं, याची माहिती आपण मागितली आहे. तर पुढे 2 फेब्रुवारीच्या बैठकीपर्यंत जागा वाटपाचा फॉर्म्यूला स्पष्ट करण्याचा आग्रह करण्यात आला आहे. दरम्यान आम्ही आमचा इगो आड येऊ देणार नसल्याचे आंबेडकर यावेळी बोलताना म्हणाले.

मात्र वंचितचा अद्यापही महाविकास आघाडीत समावेश झाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर काल जे पत्र महाविकास आघाडीकडून देण्यात आलं त्या पत्रावर असलेल्या तिघांच्या सह्यांपैकी नाना पटोले यांच्या सहीला आपण महत्व देत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ती त्यांची वैयक्तिक सही आहे. आम्ही केवळ जयंत पाटील आणि संजय राऊत यांच्या सह्या मानतो, असंही आंबेडकर म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीत वंचितला घेण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा निर्णय झाला आहे. मात्र काँग्रेसचा अद्यापही निर्णय झाला नसल्याचा दावा आंबेडकर यांनी केला आहे. तर आमचा बारा - बारा जागांचा फॉर्म्यूला 2 फेब्रुवारीच्या बैठकीत आम्ही मांडू, असेही आंबेडकर म्हणाले. त्यामुळे याच बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्यूला नेमका काय, हे स्पष्ट करण्याचा आग्रह आमचा राहील. मात्र हे सर्व होत असताना आमचा इगो आड येऊ देणार नसल्याचंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT