Yashomati Thakur on Government Sarkarnama
विदर्भ

Nikhil Wagle Atatck : महाराष्ट्राचा कानाकोपरा पूर्णपणे यूपी, बिहार होत चालला आहे

Amar Ghatare

Amravati Politics : पुणे येथे निर्भय बनो कार्यक्रमानंतर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, अॅड. असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. अशात महाराष्ट्रात यूपी, बिहार होत असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे निखिल वागळे यांच्या पाठीशी उभे राहणार का व त्यांना सुरक्षा देणार का? असा प्रश्न काँग्रेसच्या आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

संपूर्ण राज्यभरात निर्भय बनो या मंचोद्वारे अनेक व्याख्यानांचे कार्यक्रम सुरू आहेत. अशाच एका कार्यक्रमाला पुण्यात विरोध होत होता. अनेक स्तरावरून विरोध दर्शविण्यात आल्यांनतर भाजप, विश्व हिंदू परिषद यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा सोशल मीडियावरून दिला होता. त्यानंतर तिघांवरही हल्ला झाला.

काही ठिकाणी निखिल वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्या विरोधात निदर्शनेसुद्धा करण्यात आली. विरोधाला जुमानणार नाही. कार्यक्रमस्थळी जाऊ व असा निर्धार तिघांनीही केला होता. कार्यक्रम घेण्यावर तिघेही वक्ते ठाम होते. कार्यक्रमस्थळी गेल्यावर त्या ठिकाणी काही लोकांनी सभेत घोषणा दिल्या. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विश्वंभर चौधरी व असीम सरोदे एकाच वाहनातून जायला निघाले असताना भाजप व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनावर हल्ला केला. हा प्रकार निंदनीय असल्याचे ठाकूर म्हणाल्या.

तीनही वक्त्याच्या वाहनावर शाई व अंडे फेकत जोरदार घोषणा दिल्या. त्यांच्या वाहनाच्या काचादेखील फोडल्या. ही झुंडशाही असल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले. आता या संपूर्ण घटनेचा सर्वस्तरावरून निषेध होत आहे. तिघांनाही शासनाने पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली. अमरावतीमध्ये या हल्ल्याचा महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ निषेध करण्यात आला. सरकारने हल्ल्याची दखल घेतली पाहिजे अशी मागणी करण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना निखिल वागळे यांच्यावर त्यावेळी सुद्धा हल्ला करण्यात आला होता. मात्र त्यावेळी निखिल वागळे यांच्या पाठीशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व संपूर्ण सरकार उभे होते, असे ठाकूर म्हणाल्या. आता हे सरकार निखिल वागळे यांच्या पाठीशी उभे राहणार का व त्यांना सुरक्षा देणार का? असा सवाल ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

निखिल वागळे यांना जीवे मारण्यासाठीच हा हल्ला होता. यापुढे त्यांच्या जीवाला काही झाले तर त्याला सरकार जबाबदार राहणार असल्याचा इशारा यावेळी ठाकूर यांनी दिला. महाराष्ट्राच्या पावित्र्याला डाग लावण्याचे काम राज्यात सुरू आहे. हे राज्य बिहारच्या मार्गावर चालत आहे, अशी टीकाही आमदार यशोमती ठाकूर यांनी केली.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT