Nagpur News : राज्यातील जनतेने महायुती सरकारला मोठ्या संख्येने निवडून दिले आहे. आम्हाला बहुमत मिळाल्याने आमची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. राज्यात विरोधक कमी संख्येने असले तरी आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. आजच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. विरोधक कमी असले तरी महत्वाच्या प्रश्नांना उत्तर देणार असल्याचे सांगत विरोधकांनी प्रश्न मांडावेत, असा सल्ला अजित पवार यांनी दिला.
येत्या काळात आमचं सरकार जनतेच्या विश्वासाला पात्र राहिल, असे आश्वासनं देत अजित पवार म्हणाले, 'दोन ते तीन दिवसांत मंत्रिमंडळाचे खातेवाटप होणार आहे. गेल्या अडीच वर्षात आम्ही टीम म्हणून काम केल्याचे सांगत त्यांनी येत्या काळात लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. महायुती सरकारच्या काळात झालेले काम पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचे त्यांनी संगितले. त्यासोबतच विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली जातील, असे स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.