महिला

रुपाली चाकणकरांनी चित्राताईंना `जुनी आठवण` करून दिली....

सरकारनामा ब्यूरो

पुणे, ता. ११ :बहुमत असूनही सत्तास्थापन करता आली नाही. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी दिलेली मुदत संपतानाच भाजपने पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट सांगितले की, आम्ही सरकार स्थापन करणार नाही. या निर्णयाचा भाजप नेत्यांनी स्विकार केला. यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट केले. या ट्विटमुळे त्या सोशल मीडियात ट्रोल होताना दिसताहेत.

भाजपने सरकार स्थापन होऊ शकत नाही, असे जाहीर केल्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी 'सत्तेपेक्षा तत्व महत्वाचे... अभिमानास्पद निर्णय!!!' असे ट्विट केले होते. या ट्विटवरून चित्रा वाघ चांगल्याच ट्रोल झाल्या आहेत. कारण लोकसभा निवडणूकीनंतर राष्ट्रवादीमध्ये बराच काळ काम केल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे सोशल मीडियावर वाघ यांच्या तत्त्वांवरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनीही त्यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. 'ज्या पक्षाने मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा दिली, तो पक्ष सोडताना काहींना तत्व आठवली नाही, जी आता आठवायला लागली आहेत,' असा सवाल चाकणकर यांनी वाघ यांना विचारला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT