Jayant Patil On Mahayuti Govt Sarkarnama
मुंबई

Jayant Patil : सरकारकडून जाहिरातींंवर दीड हजार कोटी खर्च, टेंडरचा फोटो पोस्ट करत जयंत पाटलांची टीका

Jagdish Patil

Mumbai News, 09 Oct : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू होण्याआधी महायुती सरकारने विविध निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे.

सरकारकडून जाहीर केल्या जाणाऱ्या या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिराती देखील प्रसिद्ध केल्या जात आहेत. या जाहिरातींवर सरकारडून मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे.

अशातच आता राज्य सरकारने डिजिटल प्रसिद्धीसाठी 90 कोटींचे टेंडर काढल्याची माहिती समोर आली आहे. सरकारच्या याच टेंडरवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती (Mahayuti) सरकारवर टीका केली आहे. महायुती म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार असं म्हणत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

जयंत पाटील (Jayant Patil) सरकारच्या या टेंडरची एक प्रत आपल्या एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, फक्त काही दिवसांकरिता डिजिटल प्रसिद्धीसाठी महायुती सरकारने 90 कोटी रुपयांचे टेंडर काढलेले आहे. आतापर्यंत या सरकारने जवळपास दीड हजार कोटी फक्त प्रसिद्धीसाठी खर्च केले आहे.

या दीड हजार कोटी रुपयांमध्ये माझ्या शेतकऱ्यांना मोठी मदत देता आली असती, माझ्या तरुणांचा कौशल्य विकास करता आला असता, माझ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे गणवेश मिळाले असते. ग्रामीण, आदिवासी भागातील किती रस्ते झाले असते. विचार करा या पैशांमध्ये किती लाडक्या बहिणींना मदत झाली असती. पण शेवटी महायुती (Mahayuti) सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT