Sambhajiraje Chhatrapati, Ajit Pawar
Sambhajiraje Chhatrapati, Ajit Pawar  Sarkarnama
मुंबई

Sambhajiraje : ''अजित पवार अर्धसत्य बोलले, संभाजीमहाराज स्वराज्यरक्षकही आणि...''; संभाजीराजेंनी ठणकावलं

सरकारनामा ब्यूरो

SambhajiRaje on Ajit Pawar : छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्यरक्षक म्हणतो, काही जण मात्र धर्मवीर म्हणतात. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं होतं. .यावरुन आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपनं पवार यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून ठिकठिकाणी निषेध व्यक्त केला आहे.

मात्र, आता माजी खासदार संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी अजित पवारांच्या विधानाचा तीव्र निषेध व्यक्त करत पवार हे अर्धसत्य बोलले असून संभाजीराजे हे स्वराज्यरक्षक आहेतच शिवाय ते धर्मवीर देखील होते अशा शब्दांत संभाजीराजेंनी पवारांवर हल्लाबोल केला आहे.

संभाजीराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. संभाजीराजे म्हणाले, अजित पवार यांनी पाँईट करुन सभागृहात सांगितलं की, संभाजीराजे धर्मवीर नव्हते. पण संभाजीराजे हे धर्मवीर होते याचे अनेक पुरावे आहेत. त्यामुळे त्यांनी हे विधान करताना कोणता संदर्भ घेतला हे त्यांनीच सांगितलं पाहिजे. कारण संभाजीराजे हे स्वराज्यरक्षकच होतेच शिवाय ते धर्मवीर देखील होते.

पण अजित पवारांनी हे संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते असं विधान करताना कोणता इतिहासाचा संदर्भ घेतला हे मला माहीत नाही. इतिहासाबद्दल बोलताना पुढार्यांनी जबाबदारपणे बोलायला हवं. तसेच जबाबदार व्यक्तीने कोणतंही राजकीय व एेतिहासिक वक्तव्य करताना अभ्यासपूर्वकच बोलले पाहिजे. तसेच वाद निर्माण करणारी वक्तव्यं टाळायला हवीत. जबाबदार पुढार्यांना असं विधान करणं शोभत नाही असंही संभाजीराजे म्हणाले.

अजित पवार यांनी केलेलं विधान साफ चुकीचं असून त्यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करतो. तसेच जे लोकं इतिहासात वर्षानुवर्ष संशोधन करतात त्यांच्या अभ्यासाचं देखील आपण आत्मचिंतन करायला हवं. इतिहासातील महापुरुषांबद्दल बोलताना तारतम्य बाळगायला हवं अशा शब्दांत संभाजीराजेंनी अजित पवारांच्या विधानावर टीका केली आहे.

संभाजी महाराजांनी कधीच कुठेच धर्माचा पुरस्कार केला नाही...

छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्यरक्षक म्हणतो, काही जण मात्र धर्मवीर म्हणतात. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. संभाजी महाराजांनी कधीच कुठे धर्माचा पुरस्कार केला नाही. शिवाजी महाराजांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. यावर काही जण जाणीवपूर्वक धर्मवीर असे म्हणतात. मी मंत्रिमंडळात असताना, निर्णय घेताना सगळ्यांना सांगायचो की,स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज असा उल्लेख आपण करावा असे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT