Eknath Shinde - Manoj Jarange  Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde On Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठीची 'सह्याद्री'वरील सर्वपक्षीय बैठक संपताच मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा; म्हणाले...

Deepak Kulkarni

Mumbai : मराठा आरक्षणासाठी मागील १४ दिवसांपासून आंदोलन करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. सरकारसोबतच्या तीनदा चर्चा फिस्कटल्यानंतर राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाविषयीचा महत्त्वाचा 'जीआर' काढण्यात आला होता.

तरीदेखील वंशावळीची अट रद्द करुन सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखला देण्यात यावा अशी मागणी करत जरांगे पाटील उपोषणावर ठाम राहिले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केला जात आहेत. याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. ही बैठक संपताच शिंदेंनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. ही बैठक संपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी माध्यमांशी संवाद साधला.

या पत्रकार परिषदेत शिंदे म्हणाले, मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीची काळजी सरकारला आहे. आणि सर्वपक्षीय नेत्यांनी देखील त्यांच्या तब्येतीविषयी चिंता व्यक्त केली. सर्वपक्षीय नेत्यांनी एक ठराव पारित केला.सरकार जरांगे पाटलांच्या मागणीवर काम करतंय, त्यासाठी थोडा अवधी द्यावा. पण तब्येतीची काळजी म्हणून त्यांनी उपोषण मागे घ्यावे असा ठराव एकमताने मंजूर केल्याचेही शिंदेंनी सांगितले.

तसेच ज्या ज्यावेळी महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी अशा सर्वपक्षीय नेत्यांच्या अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत. तसेच कुठल्याही समस्येवर चर्चेतून मार्ग निघू शकतो असेही ते म्हणाले.

सरकार आणि सर्वपक्षीय नेते आपल्यासोबत आहोत. त्यामुळे आपल्या तब्येतीची काळजी आहे. त्यामुळे नेमलेल्या समितीला थोडा वेळ द्यावा अशी मागणी सरकारच्या वतीने जरांगे पाटलांना करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. जे गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेण्याची मागणी मनोज जरांगे पाटील(Manoj jarange Patil) आणि गावकर्यांनी केली होती. ती मागणी सरकारने मान्य केली असून यासंबंधीच्या सूचनाही दिल्या आहेत. तसेच लाठीचार्ज प्रकरणी दोषी तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती शिंदेंनी यावेळी दिली आहे.

मराठा आरक्षण देण्याविषयी सर्वपक्षीय नेत्यांचं एकमत आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात आपलं आऱक्षण टिकलं पाहिजे. तसेच कुठल्याही समाजाचे आरक्षण कमी न करता आपल्याला दीर्घकाळ टिकणारं आरक्षण मराठा समाजाला द्यायचं आहे. आपण जो काही निर्णय घेऊ, तो कायद्याच्या चौकटीत टिकणारा हवा आहे. तसेच पुन्हा मराठा समाजाची फसगत होता कामा नये. सरकार मराठा आरक्षणासाठी अतिशय सकारात्मक आहे असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. (Maratha Reservation)

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT