Bharat Jodo Yatra :
Bharat Jodo Yatra : Sarkarnama
मुंबई

Bharat Jodo Yatra : मुख्यमंत्रीजी राहुल गांधींची यात्रा थांबवा ; शिंदे गटातील खासदाराची मागणी!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी येथून सुरू झालेली भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात पोहचली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज विदर्भातील तिसरा दिवस, तर महाराष्ट्रातील यात्रेचा 11 वा दिवस आहे, एकीकडे ही यात्रा सुरू असताना शिंदे गटाचे खासदार ही यात्रा थांबवण्यात यावी, अशी भूमिका घेतली आहे. यामुळे आता यावरून राजकारण पेट घेताना दिसत आहे.

खासदार राहुल शेवाळे यांनी म्हंटलंय की, भारत जोडो यात्रा ही थांबण्यात यावी, अशी विनंती मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करतो, महाराष्ट्रात कायद्याचं आणि सावरकरांचं राज्य आहे, त्यांच्या विचारांचं राज्य आहे, हे त्यांना दाखवून द्या, असे शेवाळे म्हणाले. राहुल गांधी यांना सावरकरांबद्दल अपशब्द काढले, त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातून भारत जोडो यात्रा थांबवण्यात यावी, असे शेवाळे म्हणाले.

दरम्यान राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल वक्तव्य केले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रज जगाची महासत्ता होते, आणि चोवीस वर्षीय बिरसा मुंडा यांनी त्यांचा सामना केला. एक इंच देखील ते मागे हटले नाहीत. त्यांची हत्या करण्यात आली, ते शहीद झाले. मात्र सावरकरांना अंदमानात बंद केलं होतं. त्यांनी इंग्रजांना माफीनामा लिहीला. मला तुरूंगातून बाहेर काढा, अशी सावरकरांनी इंग्रजांना चिठ्ठी लिहाली. सावरकर आणि बिरसा मुंडा यांच्यातला फरक पहा, असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधींच्या याच वक्तव्यावरून याच वक्तव्यावरून आक्रमक होऊन आता शेवाळे यांनी भारत जोडो यात्रा थांबवण्याची मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आता या मागणीचा विचार होईल का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT