Students jobs|
Students jobs| 
मुंबई

Students jobs| विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; आता शिक्षणासोबतच मिळणार नोकरीचीही हमी

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्य सरकारने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांला नोकरी व पुढील शिक्षणाची हमी देणारी योजना आणली आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेसोबत राज्य सरकारने करार केला असून या कराराच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार आहे.

या योजनेंतर्गत या वर्षांत किमान १५ हजार विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्य विकासाच्या आधारावर नोकरी करता करता वेगवेगळय़ा क्षेत्रातील शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांना टाटा सामाजिक विज्ञान संस्थेकडून त्यांनी पूर्ण केलेल्या संबंधित विषयातील पदविका व पदवी प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

काल मंत्रालयात टाटा सामाजिक विज्ञान संस्थेबरोबर ‘मिलाप ’ या योजनेचा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत राज्याच्या समग्र शिक्षा कार्यालयाने यापूर्वी सुरू केलेल्या ‘मिलाप’ या योजनेद्वारे बारावीत गणितात उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एकाच वेळी उच्च शिक्षण व नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी हिंदुस्तान कॉम्प्युटर्स लिमिटेड ( HCL) कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

यासाठी आतापर्यंत ३४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी असून या योजनेंतर्गत चालू वर्षांत २५ हजार विद्यार्थ्यांची निवज करणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील योजनेत कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा कोणत्याही शाखेच्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू केली जाईल, असे समग्र शिक्षा राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT