gopal shetty
gopal shetty  sarkarnama
मुंबई

पदांचा उपयोग नाही, म्हणून भाजप खासदाराने दिला राजीनामा

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ''लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी माझ्याही पदाचा नीट उपयोग झाला पाहिजे ,असे मला वाटते. त्यामुळेच लोकांच्या प्रश्नाला पूर्णवेळ वेळ देता यावा, म्हणून मी या सर्वसमित्यांचा राजीनामा देत आहे,'' असं भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी स्पष्ट केलं. बोरिवली पश्चिम, लोकमान्य नगर येथील आपल्या कार्यालयातून गोपाळ शेट्टी (gopal shetty) यांनी फेसबुक लाईव्हवरून ही घोषणा केली.

झोपडपट्टी पुनर्वसनाच्या मुद्द्यावरुन शेट्टी यांनी सदीय कार्य समिती रेल्वे समिती आणि गृहनिर्माण समिती या सर्व समितींचे राजीनामा दिल्याचे शेट्टी यांनी जाहीर केलं. ''मागण्या पूर्ण न झाल्यास खासदारकीचाही राजीनामा देणार,'' असा इशारा शेट्टी यांनी दिला.

गोपाळ शेट्टी म्हणाले, ''गेली अनेक मी झोपडपट्टी आणि त्या ठिकाणी गरिबांना पक्क घर मिळावं यासाठी झटत आहेत. २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टी पुनर्वसनासाठी नवीन संशोधित कायदा केला होता. मात्र, या कायद्यानुसार कुठलीही अंमलबजावणी होत नाही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर प्रश्न मार्गी लावला. सर्वांना पक्के घर मिळावं हे मोदींचं स्वप्न आहे. त्यासाठीच मी संघर्ष करत आहे. त्यामुळेच मी माझ्या पदाचा राजीनामा प्रल्हाद जोशींकडे पाठवला आहे. समित्यांचा मी दिलेला राजीनामा ते स्वीकारतील अशी आशा व्यक्त करतो."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT