<div class="paragraphs"><p>Narayan Rane </p></div>

Narayan Rane

 

sarkarnama

मुंबई

जिल्हा बँकेतील विजयावर नारायण राणे म्हणाले, हा तर अकलीने मिळवलेला विजय!

सरकारनामा ब्युरो

सिंधुदुर्ग : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Sindhudurg District Bank Election) महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. भाजप (BJP) नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या सिद्धीविनायक पॅनेलचे आतापर्यंत 11 उमेदवार निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 8 जागा मिळाल्या आहेत. या विजयावर अखेर नारायण राणेंनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली आहे.

राणे म्हणाले की, ही सत्ता माझी नाही तर भाजपची आहे. जिल्ह्यातील जनता आणि देवदेवता यांच्यामुळे सत्ता आली आहे. नितेश, निलेश राणे यांची मेहनत आणि त्यांना कार्यकर्त्यांनी दिलेली साथ यामुळे आमचा विजय झाला आहे. आम्ही अकलेचा वापर करून विजय मिळवला आहे. अकलेचा वापर करणाऱ्यांना देवदेवतांची साथ मिळाली आहे. विजयाचे हे श्रेय निलेश, नितेश यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे आहे.

सिंधुदुर्गनंतर आता महाराष्ट्रातील सत्तेकडे पाहणार आहे. आता माझे लक्ष महाराष्ट्र सरकार आहे. कोकणातील तीन जिल्ह्यांतील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका दोन वर्षांनी होतील. या जिल्ह्यांत सर्व विजयी उमेदवार हे भाजपचेच असतील. चेहरा पाहवत नाही अशा लोकांना जनता लोकप्रतिनिधी ठेवणार नाही, असे राणेंनी म्हटले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. नारायण राणे विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी निवडणूक झाली. शिवसेनेचे अनेक दिग्गज पराभूत झाले आहेत. मात्र, महाविकास आघाडी आणि भाजपचेही अनेक नेते पराभूत झाले आहेत. त्यामध्ये महाविकास आघाडीचे पॅनेल प्रमुख सतिश सावंत (Satish Savant) हे चिठ्ठीवर पराभूत झाले आहेत. अखेर राणेंना जिल्हा बँकेवर वर्चस्व मिळवले आहे

जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा पराभव झाला तर सुशांत नाईक विजयी झाले आहेत. सुशांत नाईक हे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचे बंधू आहेत. वैभव यांनीच विधानसभा निवडणुकीत 2014 मध्ये नारायण राणे यांचा पराभव केला होता. त्यामुळे राणे यांचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या तेली यांचा पराभव हा नाईक यांनी दिलेला आणखी एक धक्का मानला जात आहे. तेली यांच्या नशिबात जिल्हा बॅंक नसल्याचे या निकालातून दिसून येत आहे. या आधी ते दोनदा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. आता त्यांनी पराभवाची हॅटट्रिक केली आहे.

सतिश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर हल्ला झाल्यानंचरच भाजपचे आमदार नितेश राणे अडचणीत आले आहेत. त्यामुळे सावंत यांचा पराभव भाजप आणि राणेंसाठी महत्वाचा होता. सावंत यांचा पराभव करून विठ्ठल देसाई हे विजयी झाले. राणे आणि सावंत या दोघांनाही समान मते पडली. त्यामुळे चिठ्ठीवर देसाई हे विजयी झाले. ईश्वरचिठ्ठीवर अखेर भाजप उमेदवार विजयी झाल्याने राणेंना कणकवली बालेकिल्ल्यात अब्रू राखता आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT