Chandrasekhar Bawankule, Uddhav Thackeray
Chandrasekhar Bawankule, Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

'माझे कुटुंब माझी जबाबदारी; उद्धव ठाकरेंना परिवाराशिवाय कोणीच दिसत नाही!'

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : माझे कुटुंब माझी जबाबदारी. आम्ही फक्त चार राहू बाकी कोणीच राहणार नाही. चाळीस आमदार सोडून गेले. अजून जे काही राहिले आहेत, तेही जातील अशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांना ठाकरे परिवाराशिवाय कोणी दिसत नाही, असा टोला भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी लगावला.

ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सांगितले की, एखादा माणूस खूप घाबरला की, मनातली भिती दिसू नये यासाठी मोठमोठ्याने बोलतो. त्या पद्धतीने आपली भिती बाहेर दिसू नये यासाठी उद्धव ठाकरे अशी वक्तव्ये करत आहेत, अशा शब्दांत बावनकुळे यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात अडीच वर्षे सूडभावनेने विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला. आजही ते सुधारलेले दिसत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार त्यांनी स्वीकारल्यामुळे अजूनही ते सूडबुद्धीचे राजकारण करत आहेत. त्यांचे सूडबुद्धीचे राजकारण फार काळ टिकणार नाही, असेही ते म्हणाले.

आज वशंवादावरून माझ्यावर टीका केली जात आहे. माझ्या घराण्यावर, वंशावर टीका होत आहे. मला माझ्या वंशाचा अभिमानच आहे. घराण्याचा अभिमान आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी तुमचे योगदान काय? संयुक्त महाराष्ट्र समिती फोडणारे हे जनसंघच. मात्र, तुमच्या वंशावरूनच वाद आहे. भाजपने पक्षात बाहेरचे इतके उपरे भरून ठेवले आहेत की, आता तुमचा वंश बावनकुळे की एकशे बावनकुळे हेच कळत नाही? अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT