<div class="paragraphs"><p>Nawab Malik and Sameer Wankhede</p></div>

Nawab Malik and Sameer Wankhede

 
Sarkarnama
मुंबई

वानखेडेंनी मुंबई सोडली; पण मलिकांनी त्यांना दिल्लीतही गाठले!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे ( Sameer Wankhede) यांच्यावर विविध आरोप केले आहेत. तसेच वानखेडे यांनी वयाची १८ वर्ष पूर्ण होण्याआधीच परमिट रुमचा परवाना घेतला होता, असा खळबळजनक आरोप मलिक यांनी केला होता. त्यानंतर आता मलिक यांनी केंद्रीय दक्षता विभाग (विजिलिन्स) विभागाकडे समीर वानखडे यांच्या विरोधात तक्रार केली आहे.

मलिक यानी वानखडे यांना १७ व्या वर्षांत कसा काय परवाना मिळाला. याची चौकशी करण्यासंदर्भात तक्रार केली. त्यानंतर खात्रीसाठी केंद्रीय विजिलिन्स विभागानेही नवाब मलिक यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये ही तक्रार आपण केली आहे का अशी विचारणा केली होती. त्या पत्राला देखील मलिक यांनी उत्तर देत ही तक्रार आपण केली आहे. त्यामुळे याची चौकशी करण्यात यावी अशी विनंती केली आहे. समिर वानखेडे यांचा एनसीबी मधिल कार्यकाळ संपला असला तरी मलिक यांनी केलेले आरोप त्यांची पाठ सोडायला तयार नाही.

पत्रामध्ये मलिक यांनी वानखेडे यांच्या मालमत्तेचीही तक्रार केली आहे. वानखेडे यांनी आपल्या उत्पन्नामध्ये त्यांच्या व्यवसायाचे उत्पन्न दाखवले नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांचेदेखील उत्पन्न दाखवलेले नसल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. त्यामुळे वानखेडे यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. तसेच शासकीय अधिकारी नोकरी करत असताना व्यवसाय करू शकत नाही. आता तरी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मलिक यांनी केली आहे.

नवी मुंबईत सद्गुरू नावाने हा रस्टो बार आहे. याबाबत मलिकांनी माहिती दिली होती. मलिक म्हणाले होते, समीर वानखेडे यांचे वडील उत्पादन शुल्क विभागात होते. वाशी येथे 1997-98 मध्ये एक हॉटेल सद्गुरू सुरू करण्यात आले. त्याचा परवाना समीर वानखडे नावाने नुतणीकरण करण्यात आले. त्यावेळी वानखेडे यांचे वय 17 वर्षे 10 महिने होते. हा परवाना 2022 पर्यंत वानखडे यांच्या नावावर आहे.

कमी वयाच्या मुलाच्या नावाने परवाना घेण्यात आला. 18 वर्षाच्या खालील लोकांना परवाना दिला जात नाही. शासकीय अधिकारी शासन नोकरी करत असताना व्यवसाय करू शकत नाही. हा नियमभंग आहे. आता तरी त्यांच्यावर कारवाई करावी. त्यांना अजून वाचवले तर केंद्र आणि भाजप त्यांना वाचवत आहे, असा त्याचा अर्थ होईल, अशी टीका मलिक यांनी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT