Arvind kejariwal
Arvind kejariwal Sarkarnama
मुंबई

"मित्र-नातेवाईकांना कॉन्ट्रक्ट दिल्यामुळेच मोरबी पूल दुर्घटना घडली नाही ना?"

सरकारनामा ब्यूरो

दिल्ली : गुजरातमधल्या मच्चू नदीवरील मोरबी पूल कोसळून १३४ लोकांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना काल रात्रीच्या दरम्यान घडली. यावरून आता राजकीय टीका टिपण्णी होत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या मुद्द्यावरून गुजरात सरकारवर बरसून टीकी केली. पूल बांधण्याचा अनुभव नसलेल्या कंपनीला पुलाचे बांधकाम करण्याचे कॉन्ट्रक्ट का देण्यात आले? मित्र आणि नातेवाईकांना कॉन्ट्रक्ट दिल्यामुळेच, असे अपघात होत तर नाहीत ना?'. असा सवाल केजरीवाल यांनी विचारला.

'गुजरातमधील मोरबी पूल कोसळण्याच्या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला होता आणि याचाच परिणाम म्हणून मोरबी येथील पुल कोसऴण्याची दुःखद घटना घडली आहे, असे केजरीवाल म्हणाले. गुजरातच्या मोरबी शहरातील मच्छू नदीवरील झुलता पुल रविवारी संध्याकाळी कोसळून 134 जणांचा मृत्यू झाला. एवढया मोठ्या दुर्घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने राजीनामा द्यायला हवा, असे केजरीवालांनी बोलून दाखवले.

गुजरात मधील आगामी निवडणूकीत भाजपला आव्हान देण्यासाठी आम आदमी पार्टी सज्ज आहे. आम्हाला विश्वास आहे की, यावेळेस गुजरातची जनता, आम आदमी पार्टीला सकारात्मक प्रतिसाद देतील, असेही मत केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आले आहेत. मोरबी गावला ते भेट देणार आहेत. यावेळी ते सदर घटनेतील जखमींना भेटण्यासाठी रूग्णालयात ही जाणार आहेत. तसेच ही घटना ज्या ठिकाणी घडली, त्या ठिकाणीची पाहणी ही स्वतच: मोदी करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT