Devendra Fadnavis, Ajit pawar
Devendra Fadnavis, Ajit pawar sarkarnama
मुंबई

अजित पवारांच्या शब्दाला किंमत राहिलेली नाही ; फडणवीसांचा हल्लाबोल

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ''दारु निर्मात्यांसाठी निर्णय घेणारे हे ठाकरे सरकार (CM Uddhav Thackeray) शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील आहे. आम्ही शेतकऱ्यांची वीज तोडणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) म्हणाले होते. आता वीज कनेक्शन तोडले जात आहे, त्यामुळे अजित पवारांच्या शब्दाला आघाडी सरकारमध्ये किंमत राहिलेली नाही,'' असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

''शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे, शेतकऱ्यांची वीज तोडणाऱ्या अहंकार आम्ही तोडणार,'' असे फडणवीस यांनी सांगितले. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, महाज्योती संस्था, नवाब मलिक यांचा राजीनामा आदी विषयांवरुन फडणवीसांनी ठाकरे सरकारवर पत्रकार परिषदेत हल्ला केला.

''मुंबई बॅाम्बस्फोटातील आरोपी दाऊद यांच्याशी संबध असलेल्या नवाब मलिकांच्या पाठिशी हे सरकार उभे राहत आहे. दाऊशी व्यवहार करणाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न करणारे हे सरकार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही मलिकांच्या राजीनाम्यांशी संघर्ष करणार,'' असे फडणवीसांनी सांगितले.

''उद्यापासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात आम्ही महत्वाचे मुद्दे मांडणार आहोत. त्या मुद्दांवर चर्चा झाली पाहिजे. चर्चा झाली नाही, तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल,'' असे फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले, ''मराठी आरक्षण, ओबीसी आरक्षण हे दोन्हीही महत्वाचे विषय आहे. खासदार संभाजीराजेंनी सरकारने तीच आश्वासने दिली आहेत. ओबीसी समाजाच्या महाज्योती संस्थेच्या माध्यमातून विद्यार्त्यांना शिष्यवृत्तीसाठी पैसे दिले जातात ते पैसे देणे बंद झाले आहे. महाज्योती बंद पाडण्याचे काम सरकारचे सुरु आहे. महाज्योतीला निधी मिळाला म्हणून संघर्ष करणार आहोत,''

''परीक्षांचे घोटाळे अजून संपलेले नाही. सर्वात भष्ट्राचारी सरकार म्हणून इतिहासात ठाकरे सरकारची नोंद होईल. ठाकरे सरकार हे सावकारी सरकार आहे. आरोप झाल्यानंतर मंत्री संजय राठोडांचा राजीनामा घेतला जातो, मग नवाब मलिकांचा राजीनामा का घेतला जात नाही,'' असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.

''सरकार पूर्णपणे फेल झालेले आहे. बेबड्यांना समर्पित असे हे सरकार आहे. या सरकारच्या विरोधात आम्ही मोठा एल्गार पुकारणार आहोत. या सरकारचा भष्ट्राचार उघड करणार आहे. हे सरकार लोकशाहीच्या विरोधी हे आहे. आमच्या नेत्यांना दोन वर्षांपासून टार्गेट केले जात आहे. नारायण राणे, नितेश राणे, प्रवीण दरेकर यांना त्रास देण्याचा प्रयत्न हे सरकार करीत आहे. हे कांगावा खोर सरकार आहे. आम्ही सरकारच्या आजच्या चहापानाला जाणार नाही,'' असे फडणवीस यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT