Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray, Devendra Fadnavis sarkarnama
मुंबई

आज माझे वजन 102 किलो आहे...बाबरी पडली तेव्हा 128 किलो होते..!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि माजी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील सामना आज जोरदार रंगला. बाबरी मशीद पाडण्याच्या श्रेयावरून ठाकरे यांनी फडणविसांची काल थट्टा उडवली होती. फडणविसांनी बाबरीवर पाय ठेवला असता तरी ती पडली असती, असा खोचक टोला ठाकरेंनी शिवसेनेच्या सभेत काल लगावला होता.

त्याला आज फडणवीस यांनी आक्रमक उत्तर दिले. रामजन्मभूमीच्या आंदोलनात तुमचा एकही नेता नव्हता, असे मी म्हणालो तेव्हा किती मिरची लागली? मी बाबरी पाडण्याकरीता गेलो होतो याचा मला अभिमान आहे. मी बदायूॅंच्या तुरुंगात होतो. मी तेव्हा शिवसेनेच्या नेत्याची त्या तुरुंगात वाट पाहत होतो. पण कोणीही नेता आला नव्हता. आम्ही फाईव्ह स्टारच राजकारण नाही केलं. बाबरी मशीद पाडण्यासाठी मी संघर्ष केला होता. उद्धव ठाकरे हे कुठल्या आंदोलनात होते? कोणत्या संघर्षात ते होते. मी मात्र बाबरी मशिदीच्या विरोधातील आंदोलनात पहिल्या दिवसापासून होतो. फलाटावर झोपलो. लाठ्या खाल्ल्या. म्हणून हितपर्यंत पोहोचलो. सोन्याच्या चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नाही. ही सारे घडत असताना तेव्हा उद्धवजी कुठे होते?

कारसेवकांची थट्टा उडविणाऱ्यांना माझे स्पष्ट सांगणे आहे. देशाची धर्मसंस्कृती जपण्यासाठी आम्ही वारंवार असे जात राहू. त्यांनी माझ्या वजनामुळे बाबरी पडली, असे म्हटले. केवढा विश्वास आहे माझ्यावर आहे, ते बघा. माझे वजन आजचे वजन 102 आहे आणि बाबरी मशीद पडण्याच्या वेळी ते वजन 128 किलो होते. उद्धव ठाकरेंना समजावे म्हणून त्यांच्या भाषेत सांगतो. सामान्य माणसाचा एसएसआय एक असेल तर माझा 1.5 आहे आणि बाबरी पाडायाला गेलो तेव्हा तो 2.5 होता, अशा भाषेत फडणविसांनी उत्तर दिले.

फडणवीस म्हणाले, आज मी मुख्यमंत्र्यांच्या सभेला उत्तर देणार आहे. `कल की सभा मास्टर सभा नही, लाफ्टर सभा थी`, अशी हिंदीतून सुरूवात करतांनाच कल छत्रपती संभाजी महाराज, भगवान नृसिंह भगवान की जंयती थी. एक धर्म के लिये मिटनेवाले तो दुसरे पापीयो के पेट को फाड देणेवाले. इसलिये तेजस्वी, ओजस्वी सुनने को मिलेगा एसा लगा था. लेकीन आखीर तर लाफ्टर शो खतमही नही हुआ, असा टोला फडणवीसांनी लगावला.

ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवतांना फडणवीसांनी उपस्थितांना कोविड काळात मुंबईत भ्रष्टाचार झाला की नाही? दीड लाख लोक मरण पावले की नाही? मनसुख हिरेन, शंभर कोटींची वसुली झाली की नाही? कोरोना काळात मजुरांना मुंबई सोडावी लागली की नाही? दाऊदशी संबंध असणारा मंत्री मंत्रीमंडळात आहे की नाही? असा सवाल देखील फडणववीसांनी उपस्थितांना केला.

हनुमान चालीसा राजद्रोह अन् कबरीवर माथा राजशिष्टाचार?

राज्यात पहिला असा मुख्यमंत्री बघितला ज्याने अडीच वर्षात कधीही राज्यातील जनता व विकासावर भाषण केले नाही. हनुमान चालीसा उद्धव ठाकरे माहितच नाही त्यांना त्यातील फक्त दोनच ओळी माहित आहेत. `राम दुवारे तुम रखवारे होत न आज्ञा बीन पैसा रे`. अशी टीकाही फडणवीसांनी केली. २४ महिन्यात ५३ मालमत्ता कमावली जाते, मातोश्रीला घड्याळ भेट दिली जाते, असे म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT