Fadnavis Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis On Jarange : विष प्रयोगाच्या जरांगेंच्या गंभीर आरोपावर फडणवीस मुख्यमंत्र्यासमोरच बोलले, म्हणाले...

Mayur Ratnaparkhe

Devendra Fadnavis Vs Manoj Jarange News : मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मीडियासमोर गंभीर आरोप केले. सलाईनमधून विष देऊन मला मारण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांचा प्रयत्न होता, एन्काऊंटर करण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यांना माझा बळी हवा आहे तर मीच त्यांच्या सागर बंगल्याकडे येतो, असं जरांगेंनी म्हटलं असून ते आता मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. तर जरांगेंकडून झालेल्या या गंभीर आरोपांवर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समक्ष मीडियासमोर आपले म्हणणे मांडले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'सागर बंगला हा सरकारी आहे, कोणीही सरकारी कामासाठी कधीही सागर बंगल्यावर येऊ शकतं. कोणाची अडवणूक नाही. ते कुठल्या निराशेतून ते बोलताय, कुठली सहानुभूती त्यांना घ्ययाची आहे. याबद्दल मला कल्पना नाही. ते जे बोलले ते बिनबुडाचं आहे. धादांत खोटं आहे हे त्यांनाही माहीत आहे.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याशिवाय 'मराठा समाजासाठी मी काय केलं? मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलं आणि मराठा समाजालाही माहीत आहे. आजची सारथी किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा विद्यार्थी आणि तरुणांना आशेचं स्थान आहे. त्याची सुरुवात मी केली आहे. त्याच्या सगळ्या योजनांची सुरुवात मी केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या सगळ्या अधिक सुदृढ केल्या आहेत. त्या योजनांमध्ये वाढ केलेली आहे.' असं फडणवीस म्हणाले.

याचबरोबर 'मराठा आरक्षण मी हायकोर्टात सुद्धा टिकवलं, जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टातही टिकवलं. माझं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर जे मुख्यमंत्री आले होते आणि त्यांच्यासोबत जे काही असतील, ज्यांना जबाबदाऱ्या दिल्या होत्या. जे काही असेल, पण सुप्रीम कोर्टात ते मुख्यमंत्री हे आरक्षण टिकवू शकले नाहीत. हे सुद्धा आपण सगळ्यांनी स्पष्टपणे बघितलेलं आहे. त्यामुळे कोणाच्या म्हणण्याने मराठा समाज त्या गोष्टींवर विश्वास ठेवेल, असं मानणाऱ्यांपैकी मी नाही.' असं यावेळी फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलं.

'पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, जी स्क्रीप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते, ज्या स्क्रीप्टवर शरद पवार बोलत होते, नेमक्या तशाच स्क्रीप्टवर तेच विषय जरांगेंनी का मांडावे? असा माझ्यासमोर प्रश्न आहे. त्यामुळे याच्या पाठीशी काय आहे, काय नाही?. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याची काही कल्पना आमच्याकडे आहे. ते योग्यवेळी बाहेर येईल. तूर्तास एवढच आहे, कायदा सुव्यवस्था न बिघडवता कोणी आंदोलन केलं तरी आमची हरकत नाही. पण कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन होणार नसेल, तर पोलिसांना योग्य कारवाई ही करावीच लागेल.' असं म्हणत फडणवीसांनी एकप्रकारे इशारा दिल्याचे दिसून आले.

मीडिया प्रतिनिधींनी फडणवीसांना पुन्हा सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न झाल्याच्या जरांगेंच्या आरोपाबाबत विचारले असता, फडणवीस म्हणाले 'तुमचा तरी विश्वास आहे का? अशा गोष्टींवर उत्तर द्यायची असतात का? तुम्हालाही समजलं पाहीजे. तुम्ही मला असे प्रश्न विचारतात मला तुमचं आश्चर्य वाटतं.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT