Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेवरून फडणवीसांनी विरोधकांच्या डोळ्यात घातलं झणझणीत अंजन !

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Budget Session: राज्यकर्त्यांनी भविष्याचा विचार केला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्यावर ओव्हर ड्राफ्ट घेण्याची परिस्थिती ओढावली होती. जुनी पेन्शन योजना लागू केली, तर 2030 नंतर राज्यावर बोजा वाढेल, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या डोळ्यात अंजन घातले.

विधान परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, "जुन्या पेन्शन योजनेत (Old Pension Scheme) पगाराच्या 50 टक्के पेन्शन येत होती. नव्या पेन्शन योजनेनुसार 10 टक्के सरकार आणि 10 टक्के त्यांचे स्वत:चे पैसे मिळत आहेत. जुन्या पेन्शन योजनेचा जो भार येणार आहे, त्यासाठी काही नियोजन करणे गरजेचे आहे. आज सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केल्याने काही फरक पडणार नाही. मात्र, 2030 नंतर बोजा वाढणार आहे. केवळ घोषणा करायची असेल तर पुढची निवडणूक निघून जाईल. मात्र, राज्यकर्त्यांनी भविष्याचा विचार केला पाहिजे."

यासह फडणवीसांनी (Devendra Fadnavis) पुढील सरकारवर बोजा वाढणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे, असे सांगितले. ते म्हणाले, "आपला खर्च हा एकूण 58 टक्कांपेक्षा जास्त आहे. यंदा 62 टक्के गेला आहे. पुढील वर्षी तो 68 टक्के जाईल. 2028 नंतर पुढील वर्षी तो 68 टक्के जाईल. 2028 नंतर अडीच लाख कर्मचारी निवृत्त होतील. हे सरकार पुढील सरकारवर खर्च टाकून जाणारे नसावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही यासाठी नकारात्मक नाही. त्यासाठी आर्थिक ताळेबंद पाहून निर्णय घ्यावा लागणार आहे."

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन पेन्शन योजना संपूर्ण जगात सुरू असल्याचे सांगितले. ते म्हणाले, "आर्थिक सर्व परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्राने नवीन पेन्शन योजनेत जाण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण जगात कुठल्याही अर्थव्यवस्थेत हीच पेन्शन योजना सुरू आहे. अर्थव्यवस्था बॅलेन्स ठेवायची असेल तर पेन्शन, पगार व्याजप्रदान यावरील खर्च मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. आपल्याला राज्यात जनकल्याण करायचे आहे. कर्मचाऱ्यांसह जनतेचे कल्याण, आदिवासी विकास आणि शेड्युल कास्टच्या विकासाच्या योजना राबवायच्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या पगार द्यायचे आहेत, रस्ते आहेत. कर्मचाऱ्यांच्या पगार द्यायचे आहेत, रस्ते बांधायचे आहे, विकास करायचे आहे, एससी आणि एसटीसाठी स्कॉलरशिप द्यायची आहे. या सगळ्या गोष्ठीसाठी परिस्थिती राहिली पाहिजे. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रयत्न करत असते."

फडणवीसांनी अधिवेशन संपल्यानंतर जुन्या पेन्शन योजनेसाठी बैठक घेणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, "2005 नंतर जॉईन झालेल्या कर्मचाऱ्यांची निवृत्ती जवळ आलेली नाही. आम्ही जुन्या पेन्शन योजनेसाठी नकारात्मक नाही. ज्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. ते राज्याचे तितके आर्थिक कमाईचेस्त्रोत आहेत का? केंद्र सरकार पगारासाठी पैसे देत नाही. हा घाईघाईने घेण्याचा निर्णय नाही तो शातंपणे घेण्याचा निर्णय आहे. जे सरकार जुन्या पेन्शन योजनेकडे जाईल ते येणाऱ्या सरकारवर बोजा टाकून जाणार आहेत. संघटनांसोबत मी अधिवेशनानंतर संपूर्ण दिवस बसणार असून त्यांनी दिलेला पर्याय उत्तम असेल."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT