Crime
Crime sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात चाललयं तरी काय ?

सरकारनामा ब्युरो

CM Eknath Shinde : गेल्या काही दिवसापूर्वी ठाण्यात एका रिक्षाचालकाने एका युवतीसोबत गैरवर्तन केल्याची बातमी आपण वाचली असेल, त्यांच्या व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यानंतर याच ठाण्यातून गोळीबारांची घटना घडल्यानंतर मुख्यमंत्र्याच्या ठाण्यात चाललयं तरी काय ? असा प्रश्न पडला आहे.

गेल्या काही दिवसांत घडलेल्या या दोन घटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शुक्रवारी ठाण्यात गुंडांच्या एका टोळीनं कुख्यात गुंड गणेश जाधवची गोळ्या घालून हत्या केली आहे. त्यामुळं ठाणे शहरात खळबळ उडाली आहे. ऐन दिवाळीत नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.

ठाण्यातील येऊर आणि नौपाडा परिसरात शुक्रवारी पहाटे वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. नेहमीच वर्दळीच्या भागांमध्ये गोळीबार झाल्यानं ठाण्यात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी या गोळीबारात कुख्यात गुंड गणेश जाधव याची हत्या करण्यात आल्याचं उघड झालं.

कुख्यात गुंड गणेश जाधवची हत्या झाल्यानंतर पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. आपापसातील वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. विपीन मिश्रा, सौरभ शिंदे आणि सुरज मेहरा या तीन आरोपींना पोलिसांनी वेगवेगळ्या भागातून अटक केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT