Anil Desai
Anil Desai Sarkarnama
मुंबई

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या आधी निकाल लावा : शिवसेना ठाकरे गटाची मागणी!

सरकारनामा ब्यूरो

दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी सुरु झाली. न्यायाधीशांनी सुनावणी सुरु होताच दोन्ही बाजूंना काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. पुढील सुनावणी चार आठवड्यांनी घेणार असल्याचे सांगितले. त्यामुळे ही सुनावणी लांबणीवर पडली आहे. आता २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यावर शिवेसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार अनिल देसाई यांनी यावर आपली प्रतिक्रीया दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या समोरचं हे प्रकरण आहे. न्यायालयाने काही निर्देश पक्षकारांना दिलेले आहेत. मतदारांच्या वतीने अॅड. असीम सरोदे यांनीही न्यायालयात भूमिका मांडली. त्यांचंही मत ग्राह्य धरण्यात आलं. हा संविधानात्मक पेच आहे. यामध्ये विविध मुद्दे अंतर्भूत आहेत. तरी लवकरात लवकर याचं निकाल लागणे अपेक्षित आहे, अशी शिवसेना ठाकरे गटाची भूमिका देसाई यांनी मांडली.

मुंबई महानगरपालिका आणि इतर निवडणूकांपूर्वी निकाल लागला पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे. आम्ही मांडलेली बाजू सुस्पष्ट आहे. भारताची समृद्ध लोकशाही जगासमोर येण्यासाठी लवकर निकाल लागावा, अशी आमची मागणी आहे, असे देसाई म्हणाले.

दरम्यान, न्यायाधीश चंद्रचूड यांनी, दोन्ही बाजूंच्या वकीलांनी समोरासमोर बसा बैठक घ्या. कुठल्या मुद्द्यावर कोण युक्तीवाद करणार हेही आपसात ठरवा. दोन दोन वकीलांनी कागदपत्रे बनवा, गोषवारा तयार करा आणि दोन्ही गटांनी कागदपत्रांचा गोषवारा सादर करा, असे आदेश न्यायाधीश चंद्रचुड यांनी दिले आहेत. आता पुढची सुनावणी २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT