Sanjay Raut on Maharashtra Legislative Assembly violence  Sarkarnama
मुंबई

Maharashtra politics : फडणवीसांच्या नाकासमोर दंगल झाली...; पडळकर-आव्हाडांच्या कार्यकर्त्यांच्या मारहाणीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

Maharashtra Legislative Assembly violence : विधानभवनाच्या परिसरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफाण राडा झाला. विधानभवनाच्या लॉबीतच आव्हाड आणि पडळकरांचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले.

Jagdish Patil

Mumbai News, 18 Jul : महाराष्ट्राच्या विधानभवनात गँग वॉर झाले. भारतीय जनता पक्षाने विधीमंडळात आणि त्यांच्या पक्षात गुंड टोळ्या आणल्या आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्र राज्याची संस्कृती उध्वस्त झाली, त्यांच्या नाकासमोर विधानभवनात दंगल झाली.

अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदर गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारहाणीवर प्रतिक्रिया दिली आहे.

शिवाय या मारहाणीच्या घटनेवरून त्यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. मोदी शहा यांनी महाराष्ट्रात हे काय पेरले आहे? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

गुरूवारी (ता.17) विधानभवनाच्या परिसरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफाण राडा झाला. विधानभवनाच्या लॉबीतच आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख आणि पडळकरांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले हे दोघे एकमेकांवर धावून गेले आणि दोघांनी एकमेकांना मारहाण केली.

या संपूर्ण मारहाणीचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेनंतर विधानभवन परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. शिवाय या मारहाणीचे पडसाद विधानसभेच्या सभागृहात देखील उमटले. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संबंधित घटनेचा अहवाल मागवला आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांनी आमदार आव्हाड यांना दिलं.

मात्र, या घटनेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. या सरकारच्या काळात थेट विधीमंडळात गुंडाराज सुरू झाल्याची टीका केली जात आहे. अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करत फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, महाराष्ट्राच्या विधानभवनात आज गँग वॉर झाले. भारतीय जनता पक्षाने विधीमंडळात आणि त्यांच्या पक्षात गुंड टोळ्या आणल्या आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्र राज्याची संस्कृती उध्वस्त झाली आहे.

फडणवीस हे गृहमंत्री आहेत, त्यांच्या नाकासमोर विधानभवनात दंगल झाली. आज ज्याने विधानभवनात दंगल केली ते आमदार पडळकर टीम देवेंद्रचे सदस्य आहेत. मोदी शहा यांनी महाराष्ट्रात हे काय पेरले आहे? अत्यंत वेदनादायी असे हे चित्र आहे. खरंच कुठे नेऊन ठेवलाय शिवरायांचा महाराष्ट्र?, असा सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT