Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyari  Sarkarnama
मुंबई

राज्यपाल कोश्यारींच्या कृतीने पुन्हा नवा वाद? काँग्रेसकडून व्हिडिओ ट्विट

सरकारनामा ब्यूरो

Bhagat Singh Koshyari News : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना चप्पल घालून श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे राज्यपाल पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. याआधी कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. (Bhagat Singh Koshyari News)

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्याला आज १४ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त राज्यपाल कोश्यारींनी शहिदांना अभिवादन केलं. यावेळी राज्यपालांनी चप्पल घालून शहिदांच्या स्मृतीस्थळावर पुष्पचक्र अर्पण केलं. त्यामुळे राज्यभरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राज्यपाल कोश्यारी यांचा चप्पल घालून श्रद्धांजली वाहतानाचा व्हिडिओ काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्विट केला आहे. तसेच राज्यपालांच्या या कृतीवर त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल कोश्यारी हे आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत आहेत. आता पुन्हा राज्यपाल कोश्यारींनी चप्पल घालून शहिदांना अभिवादन केल्याने नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. मात्र राज्यपालांच्या या कृतीची सारवासारव करण्याता प्रयत्न भाजप (BJP) नेते मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी केला. ''आम्ही शहिदांना अभिवादन करताना आम्हाला पोलीसांनी सांगितलं होतं चप्पल घालून किंवा काढून अभिवादन करू शकता, त्यामुळेच राज्यपालांनी चप्पल काढली नसावी, असं लोढा म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT