prakash_ambedkar
prakash_ambedkar 
मुंबई

संभाजी भिडे यांना अटक करण्याचे सोडून एल्गार परिषद समर्थकांना अडकविण्याचे प्रयत्न  : प्रकाश आंबेडकर

दीपा कदम

मुंबई : "  पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ज्यांना गुरू मानतात त्या संभाजी भिडे यांना दंगल घडविण्याच्या आरोपाखाली अटक करण्याचे सोडून एल्गार परिषद समर्थकांना अडकविण्याचे प्रयत्न सुरू आहे ", असा  आरोप  भारीप- बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला . 


 एल्गार परिषदेचे संयोजक माजी न्या. पी. बी. सावंत आणि न्या. कोळसे पाटील असताना त्यांच्याशी पोलीस चर्चाही न करता एल्गार परिषदेत सहभागी झालेल्यांना दंगलखोर ठरविले जात असल्याबाबत  नाराजी व्यक्‍त करून श्री . आंबेडकर पुढे म्हणाले ," एल्गार परिषदेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना माओवाद्यांशी संबंध असल्याचे ठरवून अटक केली जात आहे हे चुकीचे आहे . एल्गार परिषदेला नक्षलवाद्यांकडून आर्थिक मदत मिळाली असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे, त्याबाबतचे पुरावे ही पोलिसांनी जाहीर करावे . तसेच पोलिसांनी ज्या कार्यकर्त्यांना तथाकथित नक्षलवादी म्हणून अटक केली आहे त्यांच्याकडून जप्त केलेले डिजिटल पुरावे, पत्रे वगैरेही जाहीर करावे अशी माझी मागणी आहे ."

देशात आरक्षणवादी आणि आरक्षणविरोधी असा संघर्ष निर्माण करण्याचा भाजप आणि आरएसएसचा प्रयत्न असून सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न चालविला असल्याचा आरोप भारीपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. भाजपचा पोटनिवडणुकीत आलेल्या पराभवामुळेच सामाजिक अशांतता निर्माण केली जात असल्याचा संशय त्यांनीव्यक्‍त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT