Mumbai News: अंगडिया खंडणी प्रकरणात अडचणीत आलेले आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. खंडणी वसूल केल्याचा आरोप असलेले पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचं महाविकास आघाडी सरकारच्या काळात निलंबन करण्यात आलं होतं. मात्र, आता राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने त्यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अंगडिया खंडणी प्रकरणी मुंबईचे पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण राज्यात चर्चेत आलं. त्यावेळच्या महाविकास आघाडी सरकारने 22 मार्च 2022 रोजी त्रिपाठी यांचं निलंबन केलं होतं. थेट आयपीएस अधिकाऱ्याचेच नाव खंडणी प्रकरणात आल्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती.
सौरभ त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ते बेपत्ता झाले होते. त्यानंतर 16 मार्च 2022 रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सौरभ त्रिपाठी यांना फरार घोषित केलं होतं. त्यानंतर अटकेपासून वाचण्यासाठी सौरभ त्रिपाठी यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी देखील धाव घेतली होती. तर या याचिकेमध्ये सौरभ त्रिपाठी यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते.
दरम्यान, या प्रकरणामध्ये गुन्हे शाखेकडून तीन पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर डीसीपी सौरभ त्रिपाठी यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या सर्व प्रकरणामध्ये आता डीसीपी सौरभ त्रिपाठी यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेतला आहे.
Edited By : Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.