मुंबई : गेली पंधरा वर्षे घाटकोपरच्या शांतीसागर पोलिस वसाहतीच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडला होता. आता महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी हा प्रश्न अवघ्या पंधरा मिनिटात सोडविला आहे. येत्या बुधवारी या वसाहतीच्या पुनःर्विकासाची वर्क ऑर्डर जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील पोलिसांना सुनियोजित घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
घाटकोपर येथील रमाबाईनगर लगत असलेल्या शांतीसागर पोलीस वसाहतीचा प्रश्न गेली पंधरा वर्षे प्रलंबित होता. एस आर ए च्या माध्यमातून हा प्रश्न निकाली काढावा आणि पोलिसांना चांगली घरे देण्यात यावी, अशी अपेक्षा अनेकदा व्यक्त करण्यात येत होती. ही बाब गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ध्यानात आल्यानंतर त्यांनी शांतीसागर पोलीस वसाहतीचा प्रश्न निकाली काढण्याचे ठरवले. त्यानुसार, शुक्रवारी 'एसआरए' च्या बैठकीमध्ये हा विषय घेऊन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या वसाहतीच्या पुनर्विकासाला हिरवा कंदील दिला.
आव्हाड यांनी 'एसआरए'चे मुख्याधिकारी दीपक कपूर यांच्यासह सदर वसाहतीचे पाहणी केली. यावेळी कपूर यांच्याशी आव्हाड यांनी चर्चा करून येत्या बुधवारी कार्यादेश काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सदर ठिकाणी 1 हजार 700 घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यापैकी 900 घरे पोलिसांना तत्काळ देण्यात येणार आहेत. तर, म्हाडाच्या नियमानुसार अधिकची सातशे घरे निर्माण करून तेदेखील पोलिसांना वर्ग करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले
.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.